- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, न्याय आणि स्वातंत्र्य यांचे महत्त्व समाजाला शिकवले
- डॉ. आंबेडकर यांनी समाजाला संघटित होण्याचा संदेश दिला
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन
- विजय अमृतकर, आंबेडकर अभ्यासक, नागभीड
Mahaparinirvan Din 2025: भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असतो. बाबासाहेबांनी समता, न्याय आणि स्वातंत्र्याची शिकवण जनतेला दिली. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया...
1."शिका, संघटित व्हा, संघर्ष करा."
2. "स्त्रियांनी साधलेली प्रगती जितकी अधिक, तितका समाज अधिक प्रगत."
3. "शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि आंदोलन करा."
4. "मनाचे संस्कार करणे हेच मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे."
5. "इतिहास सांगतो - नीतिमत्ता आणि अर्थकारण यांच्यात संघर्ष झाला, तर विजय नेहमी अर्थकारणाचाच होतो."
6. "लोकशाही ही केवळ शासनपद्धती नाही; ती संयुक्त जीवनाची पद्धती आहे."
7. "संविधानाचा गैरवापर होताना मला दिसला, तर ते जाळणारा पहिलाच मनुष्य मी असेन."
8. "महान व्यक्ती समाजाची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असते."
9. "जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत."
10. "जीवन लांब असावे असे नाही; ते महान असले पाहिजे."
11. "आपल्याच पायावर उभे राहून आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे."
12. "सामाजिक स्वातंत्र्य नसताना कायद्याने दिलेले स्वातंत्र्य निरर्थक ठरते."
13. "कर्मठपणा, मनोधैर्य आणि चिकाटी हेच यशाचे खरे आधारस्तंभ आहेत."
14. "विवेक, धैर्य आणि स्वाभिमान असणारा मनुष्यच समाज परिवर्तन करू शकतो."
15. "स्वातंत्र्य हे मिळवायचे असते; ते कोणी देत नाही."
16. "जात हा भारतीय समाजाच्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे."
17. "मनुष्याचे मूल्य त्याच्या वंशात नसते, तर त्याच्या गुणात असते."
18. "आपले भविष्य आपल्या हातात असते; ते इतरांच्या हातात सोपवू नका."
19. "मला बुद्ध आणि त्यांचे धम्म हेच सर्वांत अधिक प्रिय आहेत."
20. "भयापेक्षा धैर्य, अंधश्रद्धेपेक्षा विवेक, आणि गुलामीपेक्षा स्वातंत्र्य श्रेष्ठ आहे."