Indian Railway Rule: भारतात रेल्वेने प्रवास करताना घरचा डबा, खाद्यपदार्थ, लोणचे आणि नातेवाईकांसाठी अस्सल देशी तूप घेऊन जाणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. अनेकदा लोक लांबच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ सोबत घेतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? भारतीय रेल्वेचे तूप, तेल आणि इतर तेलकट वस्तू प्रवासात वाहून नेण्याबाबत काही विशिष्ट आणि कडक नियम आहेत. रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवाशांना ट्रेनमधून ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त तूप घेऊन जाता येत नाही.
तूपाबाबत रेल्वेचा नियम काय सांगतो?
भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, तेल, तूप आणि रंग (Paints) यांसारख्या तेलकट किंवा द्रवपदार्थांना सामान्यतः 'लगेज' म्हणून सोबत नेण्याची परवानगी नाही. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांची गरज लक्षात घेता तूपाबाबत एक विशेष सवलत देण्यात आली आहे. जर तूप पत्र्याच्या डब्यात व्यवस्थित आणि सुरक्षितपणे पॅक केलेले असेल, तर एक प्रवासी स्वतःसोबत जास्तीत जास्त 20 किलोपर्यंत तूप ट्रेनमधून वाहून नेऊ शकतो.
(नक्की वाचा- Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)
ट्रेनमध्ये तेलकट वस्तूंवर बंदी का?
रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेल, रंग आणि तूप यांसारख्या तेलकट पदार्थांचा समावेश 'संवेदनशील' वस्तूंमध्ये होतो. ट्रेन हाय-स्पीडने धावत असताना हे पदार्थ सांडण्याची किंवा गळती होण्याची दाट शक्यता असते. तेल किंवा तूप डब्यात सांडल्यास प्रवाशांचे इतर सामान खराब होऊ शकते, डब्यातील फ्लोरिंग घसरडी होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये आग लागण्याचा धोकाही संभवतो. रेल्वेने प्रवाशांना द्रव किंवा अर्ध-द्रव पदार्थ सोबत नेताना नेहमी लीक-प्रूफ कंटेनर वापरण्याचा सल्ला दिला आहे.
(नक्की वाचा- Nashik News: विवाहितेचा 8 वेळा गर्भपात; कारण ऐकून सारेच हादरले; नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना!)
रेल्वेत या वस्तूंवर पूर्णपणे बंदी
- स्फोटक किंवा धोकादायक वस्तू
- रिकामे गॅस सिलिंडर
- सुकी पाने
- मृत कोंबड्या
- ॲसिड आणि इतर गंजणारे पदार्थ