Nautapa 2026 Health Tips: 25 मेपासून सुरू होणारा नवतपाचा कालावधी 2 जूनपर्यंत असणार आहे. या नऊ दिवसांत तापमानाचा पारा 45°C पर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी नवतपाच्या कालावधीत काही गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करावा तर काही पदार्थ आवर्जून टाळावे. यापैकीच एक भाजी म्हणजे वांगे. नवतपाच्या दिवसांत वांगी खाणे का टाळावे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
नवतपामध्ये वांगी का खाऊ नये? (FAQs)
वांग्याची प्रकृती कशी असते?
उत्तर: आयुर्वेदानुसार वांगे हे उष्ण प्रकृतीचे असते.
नवतपात वांगी का खाऊ नये?
जर तुम्ही या नऊ दिवसांत वांग्याचा आहारात समावेश केला, तर शरीरात उष्णता निर्माण करू शकते. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(नक्की वाचा : Nautapa 2026: 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा? आज दुपारी 3.43 वाजता घडणार मोठा बदल, ज्योतिर्विदांचा इशारा)
वांगी खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात?
- नवतपा कालावधीमध्ये तुम्ही वांग्याचे सेवन केले, तर तुम्हाला ॲसिडिटी (पित्त), अस्वस्थता आणि पोटात जळजळ यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
- या दिवसांत वांगी खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ अंगावर लाल चट्टे येणे, फोड येणे किंवा खाज सुटणे.
- नवतपाच्या काळात उष्ण आणि पचायला जड असलेले अन्नपदार्थ पचण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही वांगी खाल्ली तर तुम्हाला अपचन आणि उलट्यांसारखा त्रास होऊ शकतो.
नवतपाच्या दिवसांत काय खावे?
या दिवसांत कलिंगड काकडी, लिंबू पाणी, हंगामी फळे आणि ताक यासारख्या गोष्टींचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.
Photo Credit: NDTV Marathi
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)