जाहिरात

Do You Know: घाबरल्यावर हात-पाय का थरथरतात? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण

स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घ श्वास घेणे, मन शांत करणे आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक असते, जेणेकरून पुढील निर्णय योग्य रीतीने घेता येतो.

Do You Know: घाबरल्यावर हात-पाय का थरथरतात? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण
  • भीतीमुळे व्यक्तीच्या शरीरात Amygdala भाग सक्रिय होतो आणि फाइट मोडमध्ये शरीर सज्ज होते
  • भीतीच्या वेळी अ‍ॅड्रेनालाईन हार्मोन वाढल्याने हृदयाचे ठोके वेगाने पडतात आणि श्वासोच्छवास वाढतो
  • स्नायूंमध्ये ताण निर्माण होऊन शरीर थरकाप होतो, जो शरीराचा संभाव्य धोक्याशी लढण्याचा संकेत आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

अनेकदा आपण पाहतो की, जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते, तेव्हा तिचे शरीर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ लागते. ज्यामध्ये प्रामुख्याने हाता-पायांचा थरकाप सुटणे समाविष्ट आहे. भीतीमुळे अंगाला काटा येणे किंवा शरीर कापणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणाच्याही बाबतीत घडू शकते. वैज्ञानिक संशोधनानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला धोक्याची जाणीव होते, तेव्हा त्याच्या मेंदूतील 'Amygdala' (अमिग्डाला) हा भाग सक्रिय होतो. हा भाग सक्रिय होताच शरीर सक्रिय होऊन 'फाइट मोड' म्हणजेच स्वतःचा बचाव करण्याच्या भूमिकेत जाते.

Adrenaline हार्मोन आणि शरीराचा थरकाप
भीती वाटल्यास शरीरात 'Adrenaline' (अ‍ॅड्रेनालाईन) नावाच्या हार्मोनची पातळी झपाट्याने वाढते. या हार्मोनच्या वाढीमुळे हृदयाचे ठोके वेगाने पडू लागतात, श्वासोच्छवासाचा वेग वाढतो आणि स्नायूंमध्ये प्रचंड ताण निर्माण होतो. स्नायूंमधील याच अचानक वाढलेल्या ताणामुळे शरीर थरथरू लागते. हा थरकाप म्हणजे शरीर स्वतःला संभाव्य धोक्याशी लढण्यासाठी सज्ज करत असल्याचे लक्षण आहे. ज्यामुळे शरीरात प्रचंड ऊर्जा सक्रिय होते.

नक्की वाचा - Summer Drinks: उन्हाळ्यात बॉडी राहील 'सुपर कूल'! महागड्या ड्रिंक्सला द्या सुटी, प्या 'हे' 4 स्वस्त देशी सरबत

अति भीतीचे परिणाम आणि उपाय
जेव्हा भीतीचे प्रमाण खूप जास्त असते, तेव्हा मानसिक आणि शारीरिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होतात. अशा वेळी जास्त घाम येणे, चक्कर येणे किंवा अस्वस्थता वाढणे यांसारखी लक्षणे दिसतात. काही परिस्थितींमध्ये लोक बेशुद्ध देखील होतात. जर कधी अशी भीती वाटली, तर घाबरून न जाता दीर्घ श्वास घ्यावा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि सकारात्मक विचार करून परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घ्यावा.

नक्की वाचा - Akola News: '500 रुपयांसाठी 18 एकर शेती पेटवली' प्रकरण ऐकून अंगावर काटा येईल

अशा वेळी मन शांत ठेवा 
एखाद्या व्यक्तीला जेव्हा तीव्र भीती वाटते, तेव्हा त्याचे शरीर एका विशिष्ट पद्धतीने प्रतिक्रिया देते. ज्यामध्ये शरीराला थरकाप सुटणे ही सर्वात सामान्य बाब आहे. अशा वेळी मनावर ताबा ठेवणे किंवा मन शांत ठेवणे हा रामबाण उपाय आहे. तसे केल्यास तुम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळतो. तुमचे हातपाय थरथरणे थांबते. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घ श्वास घेणे, मन शांत करणे आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक असते, जेणेकरून पुढील निर्णय योग्य रीतीने घेता येतो.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com