Vat Purnima 2025: वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि कशी करावी पूजा

Vat Purnima 2025 Date: ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत केले जाते. यंदा वटपौर्णिमा कधी आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
Vat Purnima 2025: वटपौर्णिमा 2025 कधी आहे?

Vat Purnima 2025 Date: हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तिथीस प्रचंड महत्त्व असते. या तिथीस कित्येक व्रत आणि सण साजरे केले जातात. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा उपवास केला जातो. या दिवशी व्रत केल्यास महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते, असेही म्हणतात. महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. यंदा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 10 जून आणि 11 जून या दोन्ही दिवशी आहे. यामुळे वट सावित्री कधी साजरी करावी, यावरुन लोकांमध्ये गोंधळ आहे. यंदा वट पौर्णिमा कधी आहे (Vat Purnima Kadhi Ahe) आणि पूजा कशी करावी? (Vat Purnimechi Puja Kashi Karavi)  याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वटपौर्णिमा कधी आहे? (Date of Vat Savitri Vrat)

ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेची तिथी 10 जून रोजी सकाळी 11.35 वाजेपासून ते 11 जून दुपारी 1.13 वाजेपर्यंत असणार आहे. तज्ज्ञांच्या मते वटपौर्णिमा 10 जूनला आहे आणि या दिवशीच उपवास - पूजा करावी. 

Advertisement

वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? (Vat Purnima Puja Kashi Karavi?)

वटपौर्णिमेच्या दिवशी महिला अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. पूजेच्या थाळीमध्ये श्रीफळ, ओटीचे साहित्य, हळद-कुंकू, अगरबत्ती, दिवा, नाणी, विड्याची पाने, सुपारी, फुले, वडाची पूजा करण्यासाठी लागणारा धागा ही सर्व सामग्री असावी. व्रत करुन वटवृक्षाची पूजा करुन झाडाला सात, 11 किंवा 12 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांना हळदीकुंकू लावून वाण द्यावे.  

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: Happy Vat Purnima 2025 Wishes: अखंड सौभाग्याचे प्रतीक, वट सावित्रीचा सण; वटपौर्णिमेनिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश)

वट सावित्रीची कथा (Vat Savitri Katha)

पौराणिक कथांनुसार, राजा अश्वपती आणि त्यांची पत्नी मालती यांची कन्या अतिशय सुंदर तसेच हुशार होती. सावित्री असे तिचे नाव होते. जेव्हा तिचे लग्न करण्याची वेळ आली तेव्हा सावित्रीने स्वतःच पती निवडण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी सावित्रीने सत्यवानाची निवड केली, तिला माहिती होते की त्याचे आयुष्य जास्त नाहीय. म्हणून पतीच्या संरक्षणासाठी ती कायम प्रार्थना करत असे. एकदा सत्यवान जंगलामध्ये लाकूड तोडणी करताना पडला आणि त्याचा मृत्यू झाला. यावेळेस यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी प्रकट झाले. त्यावेळेस खचून न जाता सावित्रीने यमराजांचा पाठलाग केला. सत्यवानाचा जीव सोडावा, अशी विनंती यमराजांकडे केली. अखेर सावित्रीच्या भक्तीने आणि बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन यमराजाने सत्यवानाचा जीव पुन्हा दिला तसेच दीर्घायुष्याचाही आशीर्वाद दिला.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)