जाहिरात

Durgadi Fort Protest: मुस्लीम बांधवांच्या नमाजावेळी शिवसेनेचा घंटानाद! दुर्गाडीवर 40 वर्षांपासून का होते आंदोलन? वाचा इतिहास

Bakari Eid Durgadi Fort Protest; हे आंदोलन 40 वर्षांपूर्वी 1972 मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केले होते. तेव्हापासून दरवर्षी हे आंदोलन केले जाते.

Durgadi Fort Protest: मुस्लीम बांधवांच्या नमाजावेळी शिवसेनेचा घंटानाद! दुर्गाडीवर 40 वर्षांपासून का होते आंदोलन? वाचा इतिहास

अमजद खान, प्रतिनिधी:

Kalyan Durgadi Fort Shivsena Protest History: देशभरात आज बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात पार पडत आहे. ईद हा मुस्लीम बांधवांचा दुसऱ्या क्रमांकाचा पवित्र सण समजला जातो. बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी धार्मिक स्थळांमध्ये गर्दी केली आहे. एकीकडे ईदचा सण मोठ्या उत्साहात पार पडत असतानाच कल्याणमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. याचे कारण म्हणजे दरवर्षी प्रमाणे शिवसेनेकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन केले जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  बकरी ईद निमित्त शिवसेना शिंदे गटाचे दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले असून लाल चौकी परिसरात पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. पोलीस एका धर्माला नाही तर दुसरा धर्मावर अन्याय करतात. सत्तेत असलो तरी आंदोलन करणार असूनत्यांचे नमाज सुरू असताना मंदिर खुलच ठेवण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले. यावेळी शिवसेना शिंदे गटापाठोपाठ ठाकरे गटानेही जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )

काय आहे 40 वर्षांचा इतिहास?

दुर्गाडी किल्ल्यावर (Durgadi Killa) हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर नमाज वेळी दुर्गाडी किल्ल्यावर बेला मंदिरात हिंदूंना प्रार्थनेची परवानगी दिली जात नाही. त्याच्या निषेधार्थ तसेच हिंदूंनाही देवीच्या दर्शनास प्रवेश दिला जावा या मागणीसाठी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाते. हे आंदोलन 40 वर्षांपूर्वी 1972 मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केले होते. तेव्हापासून दरवर्षी हे आंदोलन केले जाते.

शिवसेनेची फूट झाल्यानंतर आता दोन्ही गट दरवर्षी मोठ्या संख्येने मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आजच्या दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करत असल्याने संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांकडून किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. लाल चौकी परिसरात पोलीस बॅरिगेड्स लावून आंदोलनकर्त्यांना थांबवण्यात येत आहे. आज बकरी ईद असल्याने परिसरात मोठा फौजफाटा तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com