बीड: मागील वर्षभरापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलेली परळी आता वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे परळीत महावितरण कार्यालय आणि नगर परिषदेच्या संगनमताने मोठा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? वाचा...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, चक्क खाजगी वीज ग्राहकांचे थकित वीज देयके चक्क परळी नगर परिषदेच्या नावावर वळते करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात तब्बल 39 लाख 23 हजार 120 इतक्या रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव चाटे यांनी केला आहे. बर फक्त वीज देयके नगरपरिषदेच्या नावावर वळते केले नाही तर बाब नगर परिषदेने महावितरणला पैसे देखील अदा केल्याचं समोर आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हदेव चाटे यांनी पुराव्यासह याबाबतची तक्रार थेट मुख्यमंत्र्यापासून ते संबंधित सर्व प्रशासकीय कार्यालयाकडे केली होती. यानंतर खडबडून जागे झालेल्या महावितरण विभागाने आता यावर विभागीय चौकशी समिती नियुक्त केली असून आठ दिवसांमध्ये या चौकशी समितीचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.
नक्की वाचा - Malegaon Sahakari Sakhar Karkhana : बारामतीच्या सत्ताकेंद्रासाठी काका-पुतणा राजकीय रिंगणात; कोण मारणार बाजी?
दरम्यान चाटे यांनी केलेल्या आरोपांनुसार 18 लोकांच्या नावावरील वीज देयके नगरपरिषदेच्या नावावर वळवली गेली आहे. यामध्ये प्रतिष्ठित व्यापारी, मोठे वीज देयके असणारे दुकाने मोठे प्रस्थ यांचा समावेश आहे.या यादीमध्ये ग्राहकांचे नाव आणि समोर नगरपरिषद असे स्पष्ट लिहिलेले दिसून येत आहे. दरम्यान चाटे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील या अर्जाद्वारे केली आहे.सध्या या अपहरणाची व्याप्ती 39 लाख 23 हजार 120 इतकी असली तरी याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.