भुपेंद्र अंबवणे, भिवंडी: पावसाळा सुरु झाल्याने साथीच्या रोगांचे, विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच भिवंडीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भिवंडीच्या भातसा नदीपात्रात दुषित पाणी सोडले जात असल्याचं समोर आले आहे. ग्रामपंचायतीने वारंवार नोटीसा बजावून देखील प्रदुषित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील डोहाळे ग्रामपंचायत हद्दीतील मोठ्या प्रमाणावर छोट्या मोठ्या कंपन्या व गोडाऊन वसलेले आहेत. मात्र या अल हलाल फुड व इतर गोडाऊन मधील दुषित व सांडपाणी येथील नाल्या द्वारे भातसा नदी पात्रात राजरोसपणे सोडले जाते. अल हलाल फुड या कंपनीचा तर चिकनचे साफ केलेले अतिशय प्रदुषित रक्त व विष्ठा मिश्रीत पाणी या नाल्या वाटे थेट भातसा नदी पात्रात सोडले जाते. यामुळे नदीतील मासे व अनेक जीवजंतू या दूषित पाण्याने मृत्युमुखी पडत आहेत.
हेच पाणी भातसा नदीकाठावरील अनेक गावांना पाणी योजनां द्वारे पिण्यासाठी वापरले जाते. तसेच हेच पाणी पिसे डॅम द्वारे मुंबईला पुरवठा केला जातो. यामुळे पर्यायाने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोकादायक बनले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळ सुरू केला आहे. त्यामुळे भातसा नदीतील पाणी दूषित झाले आहे. या बाबत ग्रामपंचायतीने संबंधित कंफनीला वारंवार नोटीसा देखील बजावल्या आहेत. तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळ, तहसीलदार यांना ही पत्र व्यवहार केलेला आहे.
नक्की वाचा - Gold Robbery Case : 35 दिवस उलटले, पण साडेपाच किलो सोनं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस हैराण
मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून कोणतीही कारवाई करत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत व ग्रामस्थ करत आहेत. कंपनी व गोडाऊनधार लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणताही मुलाहिजा न ठेवता पाणी सोडणाऱ्या कंपनी व गोडाऊनधारकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी डोहळे ग्रामपंचायत व ग्रामस्थ करत आहेत.
नक्की वाचा - Beed Crime: तुला नीट वापस जायचं आहे का? डांबून ठेवत एकाला बेदम मारहाण; बीडमधील वारकरी सांप्रदायाच्या शाळेतील प्रकार