जाहिरात

Gold Robbery Case : 35 दिवस उलटले, पण साडेपाच किलो सोनं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस हैराण

Santosh Ladda Robbery Case : छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडून 35 दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही चोरीला गेलेलं साडेपाच किलो सोनं पोलिसांना मिळालेलं नाही.

Gold Robbery Case : 35 दिवस उलटले, पण साडेपाच किलो सोनं कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर पोलीस हैराण
Robbery Case : सर्व आरोपी सोडले पण, सोनं कुठं आहे? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. (प्रतिकात्मक फोटो - AI)
छत्रपती संभाजीनगर:

Santosh Ladda  Robbery Case : छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडून 35 दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही चोरीला गेलेलं साडेपाच किलो सोनं पोलिसांना मिळालेलं नाही.  या प्रकरणात जवळपास सर्व आरोपी अटक करण्यात आली आहे. पण चोरीला गेलेल्या सोन्याचं गौडबंगाल काही संपता संपत नाही. त्यामुळे नेमकं सोनं गेलं कुठं असा प्रश्न उपस्थित होत आहे, आणि त्याचं उत्तर काही पोलिसांना मिळालेलं नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

गेल्या महिन्याभरापासून छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्याची सतत चर्चा सुरू आहे. त्याचं कारणही तसं आहे. या दरोड्याची कहानी एखाद्या वेब सिरिजला लाजवेल अशी आहे. ज्यात क्राईम आहे, ड्रामा आहे, इमोशनल आहे आणि उरलं सुरलं राजकारण देखील आहे.

या कहानीची सुरवात होते 15 मे रोजी झाली. वाळूजच्या बजाजनगरमध्ये राहत असलेल्या नामवंत उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर  15 मे रोजी पहाटे साडेतीन ते चारच्या मोठा दरोडा पडला. ज्यात साडेपाच किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरीला गेलं. एवढा मोठा दरोडा पडला म्हटल्यावर साहजिक सर्वत्र चर्चा झाली आणि पोलीस यंत्रणा देखील कामाला लागली.

( नक्की वाचा : Husband Murder : आणखी एक राजा रघुवंशी! दिल्लीची सिंधू बनली सोनम, हनीमून मर्डरपेक्षाही भयंकर प्रकरण )

हा दरोडा पडला तेव्हा संतोष लड्डा विदेशात होते. त्यामुळे त्यांच्या मेहुण्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यानंतर या प्रकरणात अमोल खोतकर मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांना कळाले आणि पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पण अमोलला पकडत असतानाच अमोलने पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रतिउत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

पण खरा ट्विस्ट पुढे आला जेव्हा दरोड्याचा मास्टर माईंड लड्ड्यांचा बालपणीचा मित्र बालासाहेब इंगोले असल्याचं पोलिसांनी सांगितले. पुढे काही दिवसातच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेला अमोलच्या बहिणीच्या चौकशीतून 30 किलो चोरीला गेलेलं चांदी शोधून काढली.

( नक्की वाचा : Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ )
 

या सर्व प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत  17 आरोपी अटक केली आहे. आठ लाखांची रोख रक्कम, तीन चार चाकी वाहन, आणि एक दुचाकी वाहन जप्त केले आहे. सोबतच 30 किलो चांदी आणि 574 ग्रॅम सोन जप्त केलं आहे. पण उरलेल्या सोनं कुठं आहे याचा पोलिसांना काही शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलीस हे सोनं कधी शोधणार? या तपासात आणखी काय नवं वळण मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com