एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; कैचीच्या साहाय्याने मानेवर वार, आरोपी अटकेत

संदीप मसराम (24 वर्ष) असं आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात कुणी नसताना आरोपी तरुणीच्या घरात बाथरुममध्ये लपून बसला होता.

Advertisement
Read Time: 2 mins

निलेश बंगाळे, वर्धा

वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय युवतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीवर कैचीने वार करण्यात आले आहेत. वर्ध्याच्या देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरोपी हा जखमी तरुणीच्या गावातीलच आहे. गुरुवारी 23 वर्षीय तरुणी ही आपल्या घरी एकटीच होती. दरम्यान ती आपल्या अंगणात भांडे घासत होती. त्याचवेळी आरोपी संदीप हा तिथे आला आणि त्याने तरुणीच्या गळ्यावर कैचीने वार केले. तरुणीने आरडाओरड केल्याने आरोपी संदीपने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी तरुणी ही रक्तबंबाळ स्थितीत परिसरातील काहींना दिसताच त्यांनी कुंपणाचे दार ओलांडून घरात प्रवेश केला. 

(नक्की वाचा - कुठे राहायला जायचे?; या क्षुल्लक कारणावरुन बायकोची हत्या)

प्रसंगवधान राखल्याने तरुणीचा जीव वाचला. आरोपीने तरुणीवर हल्ला केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर माथेफिरू संदीप हा तरुणीच्या घरात लपून बसला होता. गावकऱ्यांनी त्याला ताब्यात घेत चांगला चोप दिला आणि देवळी पोलिसांच्या  स्वाधीन केले.

(नक्की वाचा - धार्मिक कार्यक्रमांमधील निष्काळजीपणामुळे यापूर्वीही हजारो लोकांचा गेलाय बळी, जाणून घ्या कुठे-कुठे झाले होते अपघात)

जखमी तरुणीला लागलीच भिडी येथील रुग्णालयात दाखल केले. तर आरोपीवर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. देवळी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. 
 

Advertisement

Topics mentioned in this article