मनिष रक्षमवार, गडचिरोली: धान खरेदीतील चार कोटींचा कथीत घोटाळ्यानंतर धान बोनस वाटपातील अनियमितेचे प्रकरण ताजे असताना आता लाखो रुपयांच्या धान्य भरडाई गैर व्यवहार उजेडात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात लाखोंच्या धान्य भरडाई घोटाळ समोर आला असून याप्रकरणी चार गिरणीमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे धान खरेदीतील चार कोटींचा कथीत घोटाळ्यानंतर धान बोनस वाटपातील अनियमितेचे प्रकरण ताजे असताना आता लाखो रुपयांच्या ध्यान भरडाई गैर व्यवहार उजेडात आला आहे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर आता गिरणी मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भरडायीच्या नावाखाली निष्कृष्ट दर्जाचा तांदूळ शासकीय गोदामात पाठवून सामान्याच्या जीवाशी खेळणाऱ्यांना जबर हादरा बसला आहे
गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी आणि देसाईगंज येथील चार राईस मिल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून जनता राईस मिल आरमोरी, अजय राईस मिल देसाईगंज, सोनल पोहा उद्योग मिल देसाईगंज, शारदा स्टीम प्रॉडक्ट कुरुड देसाईगंज यांच्यावर अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठा अधिनियम 1980 कलम 3 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 10 भारतीय दंड संहिता 1860 कलम 420 नुसार चारही गुन्हे नोंदवण्यात आले आहे यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
( नक्की वाचा : भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला भीती, 2 महिन्यांचे रेशन गोळा करण्यासाठी पळापळ )