2 days ago

देशभरात सध्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात आहे. विविध पर्यटनस्थळे, कार्यालये तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहेत. या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले गेले आहे. 

Aug 14, 2025 18:39 (IST)

अमरावतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक आणि चालक एसीबीच्या जाळ्यात

* अमरावतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक आणि चालक एसीबीच्या जाळ्यात...

* दारू विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी महिन्याकाठी 15 हजार रुपये लाचेची केली होती मागणी...

* एसीबीने सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक सुरज रतनसिंग दाबेराव आणि चालक संजय झीमाजी देहाडे या दोघांना घेतलं ताब्यात...

* एसीबीकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Aug 14, 2025 17:46 (IST)

मास विक्री बंदीच्या विरोधात इम्तियाज जलील करणार अनोख आंदोलन

मास विक्री बंदीच्या विरोधात इम्तियाज जलील करणार अनोख आंदोलन 

उद्या दुपारी एक वाजता जलील यांच्या निवासस्थानी मटण पार्टी

मटण पार्टीसाठी जलील यांचे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

Aug 14, 2025 17:45 (IST)

LIVE Update: वसई विराराचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना 20 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना 20 तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.  माजी आयुक्त अनिलकुमार पवार, सीताराम गुप्ता, अरुण गुप्ता आणि वाय एस रेड्डी या चारही जणांना वीस तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीत असताना आवश्यक औषधे देण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

Aug 14, 2025 17:09 (IST)

गडचिरोली पोलीस दलातील 07 पोलीस अधिकारी व अंमलदारांना ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर

देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मा. महामहीम राष्ट्रपती यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकुण 07 अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक जाहिर झाले असून, हे सर्व अधिकारी व अंमलदार गडचिरोली पोलीस दलातील आहेत. गडचिरोली पोलीस दलास सन 2025 मध्ये एकूण 07 पोलीस पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून मागील पाच वर्षात एकूण 03 शौर्य चक्र, 210 पोलीस शौर्य पदक व 08 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.

Advertisement
Aug 14, 2025 15:36 (IST)

LIVE Update: जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीची परिषद सुरु

जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीची परिषद सुरु झाली आहे

या कार्यक्रमला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ उपस्थित आहेत

जनसुरक्ष विधेयकाचा विरोध का करणं गरजेचं आहे हे या परिषदेतून सांगितलं जाणार आहे

Aug 14, 2025 14:35 (IST)

LIVE Update: मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

लातूर :मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट 

  प्रताप सरनाईक यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांची मुंबईला जाण्यावरून चर्चा 

 मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम 

 जमलेल्या मराठा बांधवांनी केली जोरदार घोषणाबाजी 

 मंत्री प्रताप सरनाईक निघाल्यानंतर जोरदार घोषणाबाजी 

 आता कुठे जायचे मुंबईला जायचे म्हणत मराठा बांधवांच्या जोरदार घोषणा

Advertisement
Aug 14, 2025 11:40 (IST)

LIVE Update: महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मागे

 महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मागे

राज्य सरकार वनतारा आणि नांदणी मठ एकत्रितपणे हाय पावर कमिटीकडे हे प्रकरण सोपवणार

 सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल न करता हाय पावर कमिटीने त्यावर निर्णय द्यावा अशी मठ आणि वकिलांकडून भूमिका

 सर्वोच्च न्यायालयात जर प्रकरण गेलं तर ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता असल्याने हा निर्णय

 आज आणि उद्या दोन दिवस वकिलांची टीम हायपावर कमिटीसोबत चर्चा करणार

Aug 14, 2025 11:38 (IST)

LIVE Updates: पुणे विद्यापीठात विद्यार्थी पुन्हा आक्रमक, कॅरी ऑन च्या प्रश्नासाठी शेकडो विद्यार्थी धडकले विद्यापीठात

पुणे विद्यापीठात विद्यार्थी पुन्हा आक्रमक 

कॅरी ऑन च्या प्रश्नासाठी शेकडो विद्यार्थी धडकले विद्यापीठात

 कुलगुरूंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात केला जात आहे घोषणाबाजी

मागील ८ जुलैपासून सुरू असलेल्या कॅरी ऑन संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागणीला मात्र दीड महिना उलटूनही कुठलाही निर्णय देण्यासाठी वेळ मिळालेला नाही.

2 वेळेस मोठी आंदोलन झाली

विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि भविष्य वाचवण्यासाठी वेळ नाही

Advertisement
Aug 14, 2025 11:22 (IST)

LIVE Update: शिवसेना नाव-चिन्ह प्रकरणाची ८ ऑक्टोबरला सुनावणी

 शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, १४ जुलै २०२५ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील तारीख निश्चित करत प्रकरण २० ऑगस्ट २०२५ रोजी यादीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आता संगणक निर्मित यादीनुसार ही सुनावणी ८ ऑक्टोबर २०२५, बुधवारी पुन्हा होणार आहे.

Aug 14, 2025 11:17 (IST)

LIVE Updates: सरडेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी गयाबाई तोबरे यांची बिनविरोध निवड

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गयाबाई अभिमान तोबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, या निवडीनंतर उधळण उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. पूर्वीचे उपसरपंच वैशाली मल्हारी शिद यांनी स्वच्छ राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती

Aug 14, 2025 11:16 (IST)

LIVE Update: चिखल तुडवून अंतयात्रा स्मशानापर्यंत नेण्याची ग्रामस्थांवर वेळ

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या पिळोदा खुर्द या गावात अंत्यविधीसाठी अंतयात्रा स्मशानभूमीत घेऊन जाण्याकरता अक्षरशः चिखलातून वाट काढावी लागत असून स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिखल तुडवून अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत न्यावे लागत आहे. स्मशानभूमीपर्यंत रस्ता करावा अशी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ मागणी करत असून देखील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे..

Aug 14, 2025 10:11 (IST)

live Update: आमदार तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची ‘केस बंद’

आमदार तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची ‘केस बंद’

पोलिसांकडून न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट सादर 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिला दुजोरा

 तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

या प्रकरणाच्या तपासाची ‘फाईल’ पोलिसांनी बंद केली असून न्यायालयात ‘बी फायनल रिपोर्ट’ सादर करण्यात आला आहे

अपहरणाची तक्रार चुकीची असल्याचे समोर आले होते

ऋषिराज हे मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचे समोर आले होते

प्रकरणाचा सर्व उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पार पाडत न्यायालयाला ‘बी फायनल रिपोर्ट’ सादर केला

Aug 14, 2025 07:50 (IST)

LIVE Updates: मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता?

मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता?

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस मध्ये काही बदल होण्याच्या शक्यता

सध्याच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातील नेते नाराज असल्याचा चर्चा आहेत

वारंवार वर्षा गायकवाड यांच्याकडून पक्षातील विशेष म्हणजे मुंबईतील कमांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नेत्यांची आहे

मंगळवारी प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नेत्यांनी पुन्हा एकदा वर्षा गायकवाड यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली आहे

Aug 14, 2025 07:46 (IST)

LIVE Updates: स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल मंदिराला तिरंगा रंगांची विद्युत रोषणाई

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी तिरंगा रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराचे संत नामदेव पायरी महाद्वार , विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे शिखर आणि विठ्ठलाचा सभा मंडप अशा सर्वच ठिकाणी तिरंगा रंगांची सजावट केल्याने विठ्ठल मंदिराच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. पंढरपुरात श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची गर्दी असतानाच तिरंगा रंगांच्या विद्युत रोषणाईमुळे मंदिर अधिक खुलून दिसत आहे.

Aug 14, 2025 07:12 (IST)

Mumbai Rain: मुंबईत पावसाला सुरुवात

मुंबईत रात्रीपासून पाऊस पडत आहे

मोठ्या विश्रांती नंतर पावसाचं आगमन झालं आहे

हवामान दिललेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हा पाऊस असाच राहणार आहे

Aug 14, 2025 06:42 (IST)

LIVE Updates: पूरग्रस्त भागांची आमदार सुमीत वानखडेंनी केली तात्काळ पाहणी

पूरग्रस्त भागांची आमदार सुमीत वानखडेंनी केली तात्काळ पाहणी

आर्वीमध्ये भर पावसात पोहचले आमदार सुमीत वानखडे पुराच्या घटनास्थळी

पाण्याचा ओघ जास्त असलेल्या भागांतील नागरिकांना दिला दिलासा

नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नसल्याचे दिले वचन

Aug 14, 2025 06:42 (IST)

LIVE Updates: जळगाव महापालिकेवर करण्यात आली तिरंग्याची विद्युत रोषणाई

79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जळगाव महापालिकेवर आकर्षक तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली असून 17 मजली महापालिकेच्या इमारतीवर करण्यात आलेल्या विद्युत रचनेमुळे संपूर्ण परिसर हा उजळून निघाला आहे.

Aug 14, 2025 06:41 (IST)

LIVE Updates: सर्विस रोडवर पथ दिव्याचा खांब कोसळला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा उघड

जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तरसोद ते पाळधी दरम्यान बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण झाले असून मात्र या बाह्यवळण मार्गाच्या उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलावर असलेल्या पथदिव्याचा खांब सद्यस्थितीत वाहतूक सुरू असलेल्या सर्विस रोडवर अचानक कोसळला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. संबंधित ठेकेदाराने मुदतीच्या आत बाह्यवळण मार्गाचे काम घाईघाईत केले असून त्यामुळे या बाह्यवळण वर्गाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.