राज्यात मोसमी (Mumbai Rain Update) पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या आठवड्यात मुंबईत पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर फारसा पाऊस पडलेला नाही. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आयएमडीने पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Maharashtra Heavy Rain News) दिला आहे. त्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे (घाट परिसर) या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार दिवस म्हणजे 23 ते 27 जूनपर्यंत या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Mumbai Lakes : मुंबईकरांसाठी Good News, एकाच दिवसात 12 टक्के पाणीसाठा वाढला
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यातील पावसामुळे चांगलीच वाढ झाली आहे. सातही धरणात मिळून २६.८४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील हा सर्वाधिक साठा असल्याचं सांगितलं जात आहे. पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे राखीव साठ्याचा वापर बंद करण्यात आला आहे. दोन ते तीन दिवसात मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई पालिकेची जून महिन्यातील पाण्याची चिंता मिटली आहे.