​Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! एल निनोने घाबरवलं, पण जुलैच्या पावसाने गेम बदलला; नेमकं काय घडलं?

जुलैच्या शेवटच्या दिवसांमध्ये झालेल्या संततधार आणि मुसळधार पावसाने मुंबईच्या जलसंजीवनीचा प्रश्न सोडवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Dam Water Storage:  ​यंदाच्या पावसाळ्यात मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत मोठी वाढ झाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या उत्तरार्धात कोसळलेल्या मुसळधार धारांनी चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. सुरुवातीला एल निनोचा प्रभाव आणि मान्सूनच्या विलंबावरून यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. 

विशेषतः जून महिन्यात पावसाने अक्षरशः ओढ दिल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी जणू तळ गाठला होता. परिणामी, पाणीकपातीची टांगती तलवार मुंबईकरांच्या डोक्यावर कायम होती. परंतु, जुलै महिन्याने ही चिंता क्षणात दूर केली आहे. जुलैच्या शेवटच्या दिवसांमध्ये झालेल्या संततधार आणि मुसळधार पावसाने मुंबईच्या जलसंजीवनीचा प्रश्न सोडवला आहे.

Advertisement

Health Scheme Scam: खोटी कागदपत्रे, 17 हेल्थ क्लेम, 10 लाखांची लूट... गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये मोठा विमा घोटाळा!

मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली

उपलब्ध आकडेवारीनुसार, यंदा प्रथमच रविवारी गतवर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे दिसून आले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला परिस्थिती अतिशय बिकट होती. यंदाच्या ४ जुलै रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मिळून केवळ ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. याच्या तुलनेत गतवर्षी याच दिवशी (४ जुलै रोजी) धरणे ५०.७५ टक्के भरलेली होती. जूनमधील या अल्प प्रमाणामुळे जलव्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा? 

​परंतु, जुलैच्या दमदार पुनरागमनाने हा सर्व पाऊस भरून काढला आहे. सध्याच्या घडीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख धरणांमध्ये मिळून तब्बल ८९.०८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या तलावांच्या जलसाठ्यानुसार, मोडक सागर आणि विहार तलाव १०० टक्के भरून ओसंडून लागले आहेत.

तसेच तानसा आणि तुळशी तलाव देखील ९९ टक्क्यांहून अधिक भरले आहेत. मध्य वैतरणा ९१.६५ टक्के, भातसा ८७.१४ टक्के आणि अप्पर वैतरणा ७८.३९ टक्के भरले आहेत. या तुडुबड भरलेल्या तलावांमुळे आगामी वर्षभरातील मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, नागरिकांनी मोठा सुटकेचा श्वास सोडला आहे.

How to Get Rid of Frogs:पावसामुळे घरात बेडूक येतोय? न मारता 'असे' दूर पळवा; 'या' वासाने होतील गायब!


Topics mentioned in this article