Nashik News: ढेकळाचे पंचनामे करायचे का? कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त विधान, शेतकऱ्याला सुनावले

शेतात पडलेल्या कांद्याचे पंचनामे केले जातील घरात काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे करायचे हे नियमात बसत नाही' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins

 नाशिक: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाने कोकाटे यांच्यावर चौफेर टीका झाली होती. अशातच आता अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कशाचे ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त विधान कृषिमंत्र्यांनी केले आहे. ज्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे एक विधान पुन्हा वादात सापडले आहेत. बुधवारी सायंकाळी सिन्नर तालुक्यात पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची कोकाटे यांनी पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने पंचनाम्यांबाबत केलेल्या प्रश्नावर कोकाटे यांनी 'काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे ? ढेकळाचे पंचनामे करायचे का? असा सवाल शेतकऱ्यालाच विचारला. तसेच शेतात पडलेल्या कांद्याचे पंचनामे केले जातील घरात काढून ठेवलेल्या कांद्याचे पंचनामे करायचे हे नियमात बसत नाही' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

या विधानानंतर माध्यमांमध्ये प्रतिक्रिया उमटत असतानचा कोकाटे यांनी युटर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. मी तसे बोललोच नाही माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला मी तसे म्हणलो नाही, असे ते म्हणाले. तसेच  ज्याठिकाणी पिक नाहीच त्याचे काय पंचनामे करणार? जिथे काहीच नाही त्याचे पंचनामे करता येत नाही. हे मी जे खरे आहे ते बोललो त्यात गैर काय? असे ते म्हणाले. 

( नक्की वाचा-  Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी तसेच मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतीमालांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पाऊस आणि मॉन्सून लवकर राज्यात दाखल झाल्यामुळे 34 हजार हेक्टरहून अधिक बाधित क्षेत्र राज्यभरात आहेत. त्याबद्दलचे पंचनामे राज्य सरकारकडून करण्यात येत आहेत.

Advertisement