पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज दोन वर्धापनदिन सोहळे साजरे होत आहेत. सकाळी शरद पवार गटाचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या बालेवाडी येथून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन सोहळा साजरा केला जात आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचारांवर चालणारा पक्ष असून त्यामध्ये कधीही तडजोड होणार नाही, असं महत्त्वाचे विधान केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार?
'10 जून 1999 हा दिवस मला आठवतो. त्यावेळी शरद पवार साहेबांनी छगन भुजबळप्रफुल पटेल, भुजबळ, मोहिते पाटील या सर्वांनी मिळून राष्ट्रवादीची स्थापना केली. आपल्याला पूर्ण बहुमत मिळाले नाही आपल्याला नेहमी सत्तेत सहभागी व्हावे लागले. कुणाला आघाडी करावी लागायची, कुणाला युती करावी लागायची. अशा प्रकारची राजकीय स्थिती सर्वांनी पाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीत प्रत्येक छोट्यामोट्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले,' असं अजित पवार म्हणाले.
'एकंदरीत मी सीमाभागातील मराठी लोकांना सांगू शकतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर, यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गावर चालणारा आहे. काहीजण विचारतात तुम्ही भाजपसोबत गेला?याआधी पक्षाने शिवसेनेसोबत गेलो होतो. फक्त विरोधी पक्षात बसून, मोर्चे काढून घोषणा देऊन चालत नाही. आपण साधूसंत नाही. आपण जेव्हा भाजपसोबत जायचे ठरवले तेव्हा सेक्युलर विचारधारेचे नेतेही एनडीएसोबत होते.
शेवटी राज्याचा विकास झाला पाहिजे. केंद्राच्या राज्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असं अजित पवार म्हणाले.
नक्की वाचा - WFH Fraud : इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलली, 'वर्क फ्रॉम होम'च्या बहाण्याने महिलेला 10 लाखांचा गंडा
पुढे बोलताना ते म्हणाले की, "काहीजण जाणीवपूर्वक आपले सरकार आल्यापासून बदनामी करत आहेत. काहीजणांन सांगितलं सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला अजित पवारांनी बटेक कमी केले. बाबांनो यंदाचा ७ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जास्तीत जास्त निधी ४१ टक्के वाढवून निधी सामाजि न्याय विभागाला वाढवून दिला आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये आणत आहे. मागच्यावेळी आपला लोकसभेला दारुण पराभव झाला. 75 टक्के आपल्याला पराभव स्विकारावा लागला. कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल झाली. आम्हीही विचार केला, आम्हीही काही आज राजकारण करत नाही. शेवटी लोकांचीनाडी ओळखता आली पाहिजे. तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली
दरम्यान, "राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ पक्ष नसून महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो.समाजसुधारक संत महात्मांच्या विचाराचा वाहक म्हणून काम करतो. सत्तेचा ताम्रपट कोणी घेऊन आला नाही मात्र पुरोगामी विचार जपले पाहिजेत. सत्तेत असलो तर सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर उतरुन लढाई करायची आहे. बाबांनो यामध्ये कधीही तडजोड केली जाणार नाही. ज्यादिवशी पुरोगामी विचाराशी तडजोड होईल तेव्हा त्याला तडा जाईल, "असं अजित पवार म्हणालेत.