NDTV Marathi Manch: 'पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा', RSS ची मोदी सरकारकडं मागणी

NDTV Marathi Manch Conclave : देशाच्या शांतता आणि एकतेवर हा हल्ला आहे. त्यांना असा धडा शिकवणे आवश्यक आहे, अशी मागणी रा.स्व. संघानं केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

NDTV Marathi Manch Conclave : जम्मू काश्मीरमधल्या पहलगामध्ये झालेल हिंदूंवर दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांची हिंदू आहेत म्हणून हत्या झाली ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. बऱ्याच दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये शांतता होती. त्यामुळे विकासाला गती मिळाली होती. हा विकास थांबवण्यासाठी आणि शांतता भंग करण्यासाठी इस्लामी कट्टरपंथीयांनी हा हल्ला घडवला आहे. देशाच्या शांतता आणि एकतेवर हा हल्ला आहे. त्यांना असा धडा शिकवणे आवश्यक आहे. त्यांची इथून पुढं हल्ला करण्याची हिंमत होणार नाही, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष आणि एनडीटीव्ही मराठीला झालेल्या  वर्षपूर्ती अशा विविध औचित्यांच्या निमित्ताने एनडीटीव्ही मराठी मंच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंबेकर बोलत होते. 

Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या शंभर वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. पुढील व्हिजन सांगितले. त्याचबरोबर संघासंबंधीचे वेगवेगळ्या गैरसमजांना आंबेकर यांनी थेट उत्तरं दिली. 

Advertisement

भाजपाचा अध्यक्षाची निवड का रखडली?

भारतीय जनता पार्टीचा नवा अध्यक्ष कधी जाहीर होणार यावर सर्वांचं लक्ष आहे. भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीत संघाचा काय सहभाग आहे, त्यावर आंबेकर यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की,  भाजपासह सर्व संघटनामध्ये संघामध्ये अनेक वर्ष काम करुन ती संस्था चालवत आहेत. भाजपाची अध्यक्ष निवडण्याची एक प्रक्रिया आहे. संघ आणि भाजपामध्ये राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर औपचारिक तसंच अनौपचारिक चर्चा होते. अध्यक्षाच्या मुद्यावर त्यांना गरज वाटेल त्यावर चर्चा होते. पण, अध्यक्ष कुणाला निवडायचा तो त्यांचा अधिकार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : NDTV Marathi Manch Conclave : 'महाराष्ट्र थांबणार नाही, वेगाने पुढं जाणार'; NDTV मराठीच्या मंचावर नव्या मंत्र्यांनी सांगितलं पुढील 5 वर्षांचं व्हिजन  )
 

भाजपावर संघाचा कोणताही रिमोट कंट्रोल नाही असं सांगताना आंबेकर म्हणाले की, संघ आणि संघ विचार पद्धतीमध्ये रिमोट कंट्रोल नाही. त्या संघटनेचे निर्णय त्याचे निर्णय घेतात. भाजपाला संघाची गरज लागली नाही या चर्चा अनावश्यक आहेत. समन्वयाचं काम उत्तम पद्धतीनं सुरु आहे.

संघाची 100 वर्षाची वाटचाल

या देशातील लोकांनी या देशावर, धर्म, संस्कृतीवर विश्वास ठेवावा. त्या विश्वासावर सर्वांनी उभं राहावं. समाजातील सर्वांनी पुढं येऊन समाजात बदल घडवला पाहिजे. हे काम संघानी हाती घेतलं होतं. त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. आज भारतीयांचा भारतावर विश्वास आहे. कोणताही देश पुढं जाण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे.

हिंदूचा अर्थ आपली परंपरा, आपला परिचय, आपला देश हा स्वाभिमान समाजात जागृत होत आहे. तो कुणाच्या विरुद्ध नाही. त्यामध्ये मनात न्यूनगंड ठेवण्याचे काही कारण नाही. 100 वर्षांच्या वाटचालीत ही गोष्ट पुढं आली आहे, असं आंबेकर यांनी स्पष्ट केले.