Mumbai News : नव्या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास अधिक गतीमान; वाशी खाडी पुलावरील वाहतूक कोडींतून सुटका

नवीन पूल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (NMIA) जाणाऱ्या मार्गासाठी एक क्रांतिकारी टप्पा ठरत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

मुंबई आणि नवी मुंबईच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाशी खाडीवरील वाहतूक कोंडीला अखेर दिलासा मिळणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाशीहून मानखुर्दकडे जाणारा नवीन उड्डाण पूल पूर्णत्वास गेला असून याचे उद्घाटन 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या पुलामुळे केवळ मुंबई-नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक गतीमान झाला नाही, तर उदयोन्मुख नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (NMIA) जाणाऱ्या वाहतुकीसाठीही एक महत्त्वपूर्ण दुवा निर्माण झाला आहे. हा पूल खुला झाल्याने वाशी ते मानखुर्ददरम्यानचा प्रवास वेळ १० ते १५ मिनिटांवर आला असून, त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे.

वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय: समांतर पुलांची संकल्पना यशस्वी

सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पूल हे मुंबई-नवी मुंबई दरम्यानचे महत्त्वाचे दळणवळण केंद्र आहे. मागील काही वर्षांत कार्यालयीन गर्दी, नागरीकरण आणि वाहनांची प्रचंड वाढ झाल्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी जाणवू लागली होती. 

Advertisement

नक्की वाचा - Navi Mumbai : नवी मुंबई घणसोली बस डेपोमध्ये आगीचा भडका; 4 इलेक्ट्रिक बससह दोन डिझेल बस जळून खाक

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (MSRDC) ने ही स्थिती लक्षात घेऊन दोन समांतर पुलांची संकल्पना राबवली. यातील पहिला पूल (मानखुर्दहून वाशीकडे) ऑक्टोबर २०२४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता, तर दुसरा पूल (वाशीकडून मानखुर्दकडे) आता वापरासाठी खुला होणार आहे.

Advertisement

प्रकल्पाचे तांत्रिक तपशील

एकूण लांबी    १८३७ मीटर (मुंबईकडील पोहोच मार्ग: ३८० मीटर)
मार्गिका (लेन्स)    प्रत्येकी ३ लेन्सचे २ पूल = ६ मार्गिका
प्रशासकीय संस्था    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)
एकूण खर्च    अंदाजे ₹५५९ कोटी


विमानतळ कनेक्टिव्हिटीसाठी नवा गतीमार्ग

हा नवीन पूल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (NMIA) जाणाऱ्या मार्गासाठी एक क्रांतिकारी टप्पा ठरत आहे. वाशी ते NMIA दरम्यानचा प्रवास आता १५ ते २० मिनिटांनी कमी होणार आहे. यामुळे व्यापार, पर्यटन आणि व्यावसायिक वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.

वाहतूक विभागाचे नियोजन

Advertisement

उद्घाटनानंतर नवी मुंबई आणि मुंबई वाहतूक विभागांनी संयुक्त नियोजन करून नवीन पुलावर सुरळीत वाहतूक सुनिश्चित केली जाणार आहे.


वाहनचालकांचा दिलासा...

दररोज वाहने  - सुमारे २.५ लाख
सरासरी प्रवास वेळ  -  ३० मिनिटांवरून १०-१५ मिनिटांवर
इंधन बचत   - दरमहा अंदाजे ₹८ कोटी
CO₂ बचत  -  रोजची सुमारे १२ टन उत्सर्जनात घट
NMIA कनेक्टिव्हिटी वेळ वाचत असलेली  - १५-२० मिनिटे

या विकासात्मक प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबईमधील दळणवळण अधिक गतिमान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झाले आहे. भविष्यातील वाहतूक आणि विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा खाडी पूल एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.