Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर

अवघ्या पंधरा दिवसावर आषाढी एकादशी आहे. या काळात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने उजनी धरण (Pandharpur Palkhi 2025) झपाट्यानं भरलं आहे. सध्या उजनी धरण 75 टक्के भरले आहे. अशातच भीमा नदी 36 हजार क्युसेक्य इतका विसर्ग प्रवाहित आहे. तर वीर धरणातूनही नीराच्या माध्यमातून पुढे भीमा नदीत पाणी येत आहे. त्यामुळे साहजिकच पंढरपूरच्या भीमा नदीला पुराचा धोका (Flood threat to Bhima river in Pandharpur) निर्माण झाला. आषाढी यात्रेच्या तोंडावरच पुराचा धोका निर्माण झाल्याने पूरनियंत्रणासाठी प्रशासनाच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आषाढी वारीत आपत्कालिन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धरणातही पाणी राहावे आणि नदीतूनही पाणी पुढे प्रवाहित राहावे, असं नियोजन केलं आहे. यासाठी दहा हजारापासून ते 36,000 क्युसेक्सपर्यंत नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामी 77% पर्यंत पोहोचलेले उजनी धरण आता 74 टक्क्यांवर स्थिरावले आहे. त्यामुळे साहजिकच पुरयंत्रणासाठी पाणी नियोजनाचे शर्तीचे प्रयत्न उजनी धरण व्यवस्थापन समिती आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद करताना दिसतात.

उजनीबरोबर (Chandrabhaga river at risk of flood) गेल्या काही दिवसांपासून नीरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वीर धरणातून 6537 क्युसेक इतके पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. हाच विसर्ग आज मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून 15 हजार करण्यात येत आहे. त्यामुळे नीरा नदीत सोडण्यात आलेले पाणी अकलूज येथील नीरा–भीमा संगम येथून पुढे भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीला मिळते. त्यामुळे सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळी ही चाळीस हजार क्युसेक्सच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Shirdi Santhan News: शिर्डीमध्ये VIP भाविकांसाठी 'दर्शन ब्रेक' व्यवस्था! साई संस्थानचा मोठा निर्णय

चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्याने वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, सर्व संतांच्या पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. अनेक भाविक इथे येऊन चंद्रभागा नदीचे स्नान करून देवाचे दर्शन घेवून पायी वारी करतात. त्यामुळे भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. भाविकांनी स्नान करते वेळी वाहत्या पाण्याचा अंदाज घ्यावा. काळजी घेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे, असे असले तरी चंद्रभागा नदी पुन्हा एकदा वाहती झाली आहे.     

पूर स्थिती होऊ नये म्हणून नियोजन : पालकमंत्री गोरे

अवघ्या पंधरा दिवसावर आषाढी एकादशी आहे. या काळात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले आहे. 28 जून पर्यंत उजनी धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा काही प्रमाणत कमी होईल. जर पाउस पडला तर धरणात पाणी साठवता येईल जेणेकरून नदी पात्रात पाणी सोडता येवू नये. तसेच वीर धरणातून पण असेच नियोजन केले आहे असे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Advertisement