Hanuman Jayanti 2025 : महिलांनी ब्रिटीशांना झुगारत रथाचा दोर ओढला, तब्बल 100 वर्ष जुनी अनोखी परंपरा

या अनोख्या परंपरेमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हनुमान जयंती दिनी रथ ओढण्याचा मान हा महिलांनाच दिला जातो.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनिल दवंगे, प्रतिनिधी 

Hanuman Jayanti 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो. ब्रिटीशांनी या रथाला बंदी घातली होती. मात्र ही बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली ही रथयात्रा काढली होती. तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे. या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संगमनेरातील या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळ महत्त्व आहे. या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना असून हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिलाची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. 

Advertisement

रथाचा मार्ग कसा असतो? 


परंपरेनुसार "बलभीम हनुमान की जय" चा जयघोष करत महिलांनी रथ ओढत हनुमान जयंती रथ यात्रेला प्रारंभ केला जातो. चंद्रशेखर चौक श्रीराम मंदिर येथून सुरू झालेली रथ यात्रा पुढे रंगारगल्ली, कॅप्टन लक्ष्मीचौक, साळी वाडा, शास्त्री चौक, माळीवाडी, चावडी, बाजरपेठ नंतर नेहरू चौक मार्गे श्रीराम मंदिरात रथ यात्रेचा समारोप होतो.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Hanuman Jayanti 2025 Wishes: संकट मोचन, दुःख निवारक! हनुमान जन्मोत्सवानिमित्त पाठवा भक्तिमय शुभेच्छा संदेश

काय आहे इतिहास


महिलांना मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास असून ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतलं होतं. 23 एप्रिल 1929 रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक 200 ते 250 महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला. पण या आदिशक्तीस्वरुप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला. या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि  इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेऊन कुणालाही काही कळण्याच्या आत रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली.

कसा आहे बजरंगबलीचा रथ


लाकडापासून बनवलेल्या या रथाला श्री बजरंगबली विजय रथ म्हणून संबोधले जाते. हा रथ अत्यंत पुरातन असून 2022-23 का़ळात त्याची डागडुजी करण्यात आली आहे. चार मजबूत चाके, ओढण्यासाठी जू, वरच्या बाजूल शेंदूर लावलेली बजरंगबली मुर्ती असा अत्यंत सुंदर असा हा रथ आहे.