Success Story: पापड उद्योगातून महिन्याला कमावतायेत 70,000 रुपये; जळगावातील महिलेचा कौतुकास्पद आत्मनिर्भर प्रवास

Jalgaon Woman Success Story: जळगावातील महिलेने यशस्वीरित्या स्वतःचा पापड उद्योग उभारला आणि दरमहिन्याला मोठी रक्कम कमावत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Success Story: पापड उद्योगातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल (प्रतिकात्मक फोटो)

Jalgaon Woman Success Story: दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महागाई आणि सततच्या संकटांमुळे शेती करणारा माणूस दिवसेंदिवस हतबल होत असताना जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामीण महिलेनं निसर्गाच्या सर्व संकटांवर मात करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. या महिलेने ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवलाय. ज्योती पाटील यांची यशोगाथा जाणून घेऊया...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्योती पाटील यांचा आत्मनिर्भर प्रवास

अमळनेर येथील ज्योती पाटील या पारंपरिक शेतकरी कुटुंबातील. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे त्या देखील त्रासल्या होत्या, शेतीतून फारसा नफा मिळत नसल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आणि अंमलातही आणला. घरामध्ये उडदाची, नागलीची आणि आंब्याची शेती असल्याने त्यांनी अन्नप्रक्रिया उद्योगात संधी शोधली. पापड, लोणचे, आवळा सरबत इत्यादी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी घरातीलच कच्चा माल वापरुन त्यांनी नवा उद्योग सुरू केला. 

Advertisement

शासकीय योजनांची मदत

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आर्थिक मदत, मशीनरी खरेदीसाठी अनुदान आणि मार्गदर्शन ज्योती पाटील यांनी मिळवले. याद्वारे त्यांनी एकूण 10 लाख रुपयांचा प्रकल्प उभारला, यातील सात लाख रुपयांची पापड निर्मिती यंत्रणा शासनाच्या तीस टक्के अनुदानासह साकारण्यात आली. 2020-21 ज्योती पाटील यांनी "कुलस्वामिनी पापड उद्योग" सुरू केला.

Advertisement

(नक्की वाचा: Eknath Shinde: 'माझे 2 अधिकारी जळगावमध्येच थांबतील..' 'लाडक्या बहिणी'च्या मदतीला उपमुख्यमंत्री धावले)

रोजगारी आणि उत्पादन क्षमता 

सुरुवातीस छोट्या प्रमाणात सुरू केलेला हा उद्योग आता प्रत्येक महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंतचे उत्पादन देत आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन संपूर्ण सेंद्रिय आणि रसायनमुक्त असल्यामुळे ग्राहकांकडून यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पाच प्रकारचे पापड, विविध प्रकारची लोणची, आवळा कँडी, मुरांबा आणि सरबत अशा उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. ज्योती पाटील यांनी तयार केलेले खाद्यपदार्थांना इंदुर, जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, सुरत या शहरांमध्ये चांगली मागणी आहे. या उद्योगामुळे आज तीन ते चार महिलांना स्थायी रोजगार मिळाला आहे. गावातील अनेक महिलांनी ज्योती पाटील यांचा प्रकल्प प्रत्यक्ष पाहून प्रेरणा घेतलीय.  

Advertisement

कोणत्याही मोठ्या पदवीचे शिक्षण घेतलेले नसताना ग्रामीण भागात राहूनही पारंपरिक जीवनशैलीतून बाहेर पडत ज्योती पाटील यांनी मोठी झेप घेतली आहे. त्यांचा हा प्रवास अन्य महिलांसाठीही प्रेरणा ठरत आहे.  

Content Credit : महासंवाद