Mumbai News: ब्रिटिशांची एक घोषणा.. कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल; 1832 मध्ये काय घडलेलं?

ब्रिटिश सरकारने भटक्या कुत्र्यांना मारण्यासाठी बक्षीसही जाहीर केले होते. मारल्या जाणाऱ्या प्रत्येक भटक्या कुत्र्यासाठी सरकार लोकांना आठ आणे बक्षीस देत असे.

जाहिरात
Read Time: 3 mins

 Riot Due To Stray Dogs: सध्या देशात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा कायमच चर्चेत आल्याचे पाहायला मिळतो. हे प्रकरण कोर्टातही गेले असून सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निर्णय काय येतो? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ब्रिटिश काळात, मुंबईत भटक्या कुत्र्यांना मारण्यासाठी अनेक क्रूर पद्धती वापरल्या जात होत्या. ब्रिटिश सरकारने भटक्या कुत्र्यांना मारण्यासाठी बक्षीसही जाहीर केले होते. मारल्या जाणाऱ्या प्रत्येक भटक्या कुत्र्यासाठी सरकार लोकांना आठ आणे बक्षीस देत असे.

कुत्र्यांना पकडण्यासाठी बक्षीस..

१९ व्या शतकात असा काळ होता जेव्हा मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. कुत्र्यांचे हल्ले आणि आजार हे ब्रिटिशांसाठी चिंतेचे विषय होते. मालकांशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना "परिया कुत्रे" म्हटले जात असे. १८१३ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनी सरकारने प्रथम अशा कुत्र्यांना मारण्यासाठी धोरण लागू केले. या धोरणानुसार, दरवर्षी १५ एप्रिल ते १५ मे आणि १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत प्रशासन भटक्या कुत्र्यांना पकडून मारत असे. त्यांना मारहाण करून, गोळी घालून, गॅस चेंबरमध्ये टाकून किंवा विष देऊन मारले जात असे.

भटक्या कुत्र्यांना संपवण्याच्या पद्धती कुचकामी ठरल्या तेव्हा १८३२ मध्ये ब्रिटिश सरकारने एक नवीन धोरण जाहीर केले. या धोरणानुसार, भटक्या कुत्र्यांना मारणाऱ्या नागरिकांना शहर दंडाधिकाऱ्यांकडून बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मारल्या जाणाऱ्या प्रत्येक कुत्र्यासाठी आठ आणे बक्षीस होते. त्या काळात आठ आणे ही मोठी रक्कम होती. त्यानंतर, मुंबईत लोकांनी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना मारण्यास सुरुवात केली. बक्षिसाच्या आमिषाने, अनेक तरुण टोळ्या तयार झाल्या आणि शक्य तितक्या जास्त कुत्र्यांना मारण्यासाठी स्पर्धा करू लागल्या.

VIDEO: जपानी मुलीचा 'तो' व्हिडिओ.. 'मराठी'वरुन सरसंघचालकांवर निशाणा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

बक्षिसाच्या घोषणेनंतर, कुत्र्यांना अमानुषपणे मारले गेलेच, परंतु आणखी एक प्रतिकूल परिणाम असा झाला की अनेक पाळीव कुत्र्यांनाही पकडले गेले आणि मारले गेले. कुत्रे पकडणाऱ्यांच्या टोळ्या अनेकदा लोकांच्या घरात घुसून त्यांचे कुत्रे हिसकावून घेत असत. ६ जून १९३२ रोजी, जेव्हा काही लोक एका पारसी माणसाकडून कुत्रा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा पोलिस तिथे पोहोचले आणि त्याला मारहाण केली. पारसी समुदाय कुत्र्यांना पवित्र मानतो आणि या घटनेने व्यापक प्रतिक्रिया निर्माण झाल्या. पारशी समुदायाने शहरात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली, ज्याला हिंसक वळण लागले. पोलिस आणि निदर्शकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. अखेर, ब्रिटिश सरकारने माघार घेतली आणि कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांना मुंबईबाहेर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

शहराबाहेर कुत्र्यांना सोडण्याचे धोरण काही दिवसच टिकले. पुन्हा एकदा त्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी, मुंबईच्या महालक्ष्मी धोबीघाटाच्या मागे एक कत्तलखाना बांधण्यात आला. महानगरपालिका कर्मचारी शहरभरातून कुत्रे पकडून कत्तलखान्यात आणत असत. कुत्र्यांना तीन दिवस तिथे ठेवण्यात येत असे. जर कोणी त्यांचा दावा करायला आले नाही तर तिसऱ्या दिवशी त्यांना विजेचा धक्का देऊन मारण्यात येत असे. पिल्लांना क्लोरोफॉर्म क्रेटमध्ये बंद करून मारण्यात येत असे. १९९४ पर्यंत अशा प्रकारे हजारो कुत्रे मारण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर कत्तलखाना बंद करण्यात आला.

Traffic Issue: भलामोठा कंटेनर अडकला, जुन्या मुंबई- पुणे हायवेवर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगा

Topics mentioned in this article