जाहिरात

Ujani Dam : उजनी धरणाच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग, जून महिन्यातच 16 दरवाजे उघडले!

Ujani Dam News : उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 11 हजार 600 क्युसेकने  विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून हे पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

Ujani Dam : उजनी धरणाच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग, जून महिन्यातच 16 दरवाजे उघडले!
Ujani Dam : उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यानं प्रशासनाची काळजी वाढली होती.
इंदापूर, पुणे:

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Ujani Dam News : उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 11 हजार 600 क्युसेकने  विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून हे पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. आज संध्याकाळी (गुरुवार 20 जून 2025) पाच वाजल्यापासून हे पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या उजनी धरण 68 पूर्णांक 28 टक्के क्षमतेने भरले असून उजनीत एकूण 100 पूर्णांक 24 टीएमसी पाणी साठा झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार हा प्रवाह कमी अधिक करण्यात येऊ शकतो. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आषाढी यात्रा काळात पंढरपूरला येणाऱ्या 18 ते 20 लाख भाविकांना पुराचा त्रास होऊ नये यासाठी आज उजनी धरणातून  पाच वाजता दहा हजार क्युसेक वीसर्गाने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुणे परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने पंढरपूर वर पुराची टांगती तलवार ऐन यात्रा कालावधीत राहणार होती. यावर तोडगा म्हणून आता उजनी धरणातून दहा हजार क्युसेक विसर्गा ने भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. 

( नक्की वाचा : Satara News : साताऱ्यातील ही पर्यटनस्थळं 19 ऑगस्टपर्यंत बंद, जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय )
 

उजनीच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच धरण जूनमध्येच वेगाने भरू लागल्यानंतर प्रशासनाची शासन चिंता वाढली होती. सध्या उजनी धरणात जवळपास 64% एवढे पाणी असून जोरदार पाऊस सुरू असल्याने यात्रेपूर्वीच पंढरपूरला पुराची शक्यता होती. यामुळे आता उजनी धरणाची पातळी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न धरण प्रशासनाकडून केला जात आहे. 

 पंढरपूरला येणाऱ्या भीमा नदीत जसा उजनी धरणातून विसर्ग येतो तसाच वीरधरणातूनही विसर्ग सोडला जात असतो. नीरा नरसिंगपूर येथे वीर धरणातून सोडलेले पाणी भिमेला मिळते आणि हा विसर्ग पंढरपूरला येत असतो. सध्या वीर धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com