Tharala Tar Mag Marathi Serial : सायलीला लागणार अर्जुनची उष्टी हळद? PHOTOS
Tharala Tar Mag Marathi Serial : ठरलं तर मग मालिकेमध्ये सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागणार का?
-
सायलीच्या आयडियामुळे तिचा आणि अर्जुनचा संगीत सोहळा पार पडला. आता यानंतर अर्जुन सुभेदार आणि सायलीचा हळदी समारंभही पार पडणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
-
स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेचे कथानक अतिशय रोमांचक वळणावर पोहोचले आहे.
-
अर्जुन सुभेदार आणि प्रियाचे खरंच लग्न होणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
-
पूर्णा आजीच्या हट्टाखातर अर्जुनने तन्वीसोबत लग्न करण्याचे वचन दिले.
-
अर्जुनने मनाविरोधात हा निर्णय घेतला असला तरी सायलीनेही अर्जुन आणि तन्वीचे लग्न होऊ द्यायचं नाही, असे पक्के ठरवले आहे.
-
अर्जुन आणि तन्वीचे लग्न मोडून काढण्यासाठीच सायली वेश बदलून त्यांच्या लग्नाच्या विधींमध्ये सहभागी झालीय.
-
एकीकडे अर्जुन आणि तन्वीचा हळदीचा सोहळा सुरू असताना अर्जुनची उष्टी हळद सायलीला लागणार आहे.
-
'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील ईश्वरी आणि तिच्या बहिणीच्या प्लॅनमुळेच हे शक्य झाले आहे.
-
मेंदी,संगीत सोहळा आणि आता अर्जुनच्या नावाची उष्टी हळद, असे सारे काही आतापर्यंत सायलीच्या मनासारखे झालंय.
-
त्यामुळे सायली आणि अर्जुनचीच लग्नगाठ बांधली जाणार का? की मालिकेत आणखी काही ट्वीस्ट येणार? हे पाहण्याची प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement