
CDS Anil Chauhan Statement: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahlgam Terriorst attack) भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षात (Operation Sindoor) भारताची किती लढाऊ विमाने पडली ? या प्रश्नावरून राजकारण तापताना दिसत आहे. भारत-पाक लष्करी संघर्ष थांबल्यानंतर 20 दिवसांनी शनिवारी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यानंतर काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अनिल चौहान यांच्या एका विधानामुळे हे प्रकरण तापले आहे. सिंगापूरमधील 'शांगरी-ला' संवादात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या सीडीएस अनिल चौहान यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत भारताची विमाने पाडण्याशी संबंधित प्रश्नावर संदिग्ध उत्तर दिले, त्यामुळे वाद सुरु झाला आहे.
किती विमाने पडली...या प्रश्नावर CDS यांनी काय सांगितलं?
सिंगापूरमधील 22 व्या शांगरी-ला डायलॉगमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले भारतीय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अनिल चौहान यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोणतीही लढाई कोणत्याही नुकसानीशिवाय लढली जाऊ शकत नाही. भारताने पाकिस्तानला ज्या प्रभावी पद्धतीने प्रत्युत्तर दिले, त्याचे कौतुक होत आहे.
सीडीएस पुढे म्हणाले की, चांगली गोष्ट ही आहे की आपण आपली सामरिक चूक समजून घेण्यास सक्षम आहोत, ती सुधारू शकतो. दोन दिवसांनंतर पुन्हा त्याची अंमलबजावू करू शकतो. त्यानंतर आपली सर्व जेट विमाने लांब पल्ल्यावर लक्ष्य साधत पुन्हा उडवू शकतो. चौहान यांच्या या वक्तव्यानंतर देशात राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
( नक्की वाचा : PM Modi On Pakistan : 'शत्रू कुठेही असो 'हौंक देंगे', PM मोदींचं पाकिस्तानला कनपुरिया स्टाईलनं उत्तर! )
संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी
चौहान यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. ते म्हणाले की, आम्हाला ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न विचारायचे आहेत. काँग्रेस अध्यक्षांनी ऑपरेशन सिंदूरच्या तपासाची मागणी केली आणि कारगिलप्रमाणे पुनरावलोकन समिती स्थापन करावी असे म्हटले. खरगे म्हणाले की, सीडीएस यांच्या वक्तव्यानंतर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे.
काँग्रेस नेते खरगे यांनी सोशल मीडिया मंच एक्सवर एका लांब पोस्टमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली. त्यांनी लिहिले की, सिंगापूरमध्ये सीडीएसने दिलेल्या मुलाखतीच्या संदर्भात काही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे विचारले जाणे आवश्यक आहे. हे प्रश्न तेव्हाच विचारले जाऊ शकतात, जेव्हा संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावले जाईल.
( नक्की वाचा : Operation Sindoor नंतर वादग्रस्त व्हिडिओ, पुण्याच्या मुलीला बंगाल पोलिसांकडून अटक! AIMIM नेत्यावर आरोप )
काँग्रेस अध्यक्षांनी पुढे लिहिले की, सरकारने देशाला दिशाभूल केली आहे. युद्धाचे सावत आता दूर होत आहे. आपल्या वायुसेनेचे वैमानिक शत्रूंशी लढताना स्वत:चा जीव धोक्यात घालत होते. आपल्याला काही नुकसान झाले आहे, परंतु आपले वैमानिक सुरक्षित आहेत.
आपल्या पोस्टमध्ये, सीडीएसच्या मुलाखतीचा संदर्भ देत खरगे यांनी लिहिले, "सीडीएसनुसार, 'आम्ही ते तयार केले, त्यात सुधारणा केली, ते ठीक केले आणि नंतर दोन दिवसांनंतर ते पुन्हा लागू केले आणि आपली सर्व जेट विमाने पुन्हा लांब पल्ल्यापर्यंत लक्ष्य करत उडवली'."
In the wake of the remarks made by the Chief of Defence Staff (CDS) in Singapore in an interview, there are some very important questions which need to be asked.
— Mallikarjun Kharge (@kharge) May 31, 2025
These can only be asked if a Special Session of the Parliament is immediately convened.
The Modi Govt has misled the…
यासोबतच, काँग्रेसने युद्धविरामाशी संबंधित ट्रम्पच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी लिहिले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम घडवून आणल्याचा आपला दावा पुन्हा एकदा केला आहे. हा शिमला कराराचा सरळ अपमान आहे. संघर्षविराम कराराच्या अटी काय आहेत? हे 140 कोटी देशभक्त भारतीयांना हे जाणून घेण्याचा हक्क, असं खरगे यांनी म्हंटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world