Eknath Shinde: पालखी प्रस्थानपूर्वी वारकरी दिंड्यांना मिळणार 20 हजार रुपये अनुदान

त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्यावतीने हे अनुदान दिले जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आषाढी वारीसाठी  दिंड्या पंढरपूरकडे प्रस्तान करत आहेत. राज्य भरातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढपूरमध्ये दाखल होतात. महिनाभर पायी वारी करून त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्राची ही परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. अशात सरकारने या दिंड्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान प्रस्थान पूर्वी दिले जाणार आहे. याचा मोठा फायदा दिंड्याना होईल.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाला याबाबत सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षी 1500 दिंड्यांना तीन कोटी रुपयांचा अनुदान वाटप झाले होते. अगदी तशाच पद्धतीने यंदाही वारकऱ्यांना दिंडी अनुदान दिले जाईल. याबाबत एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले हे देखील गेल्या काही दिवसांपासून दिंडी अनुदानासाठी प्रयत्नशील होते. यानंतर आता भोसले महाराजांना एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

ट्रेंडिंग बातमी - NCP Politics : शरद पवार गटाचे अस्वस्थ आमदार फुटण्याच्या मार्गावर; सूत्रांची माहिती

त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्यावतीने हे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना थोडा का होईना दिलास मिळेल असं अक्षय महाराज भोसले यांनी सांगितलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून दिंड्या या पंढरपूरच्या दिशेने जात असतात. या दिंड्यांसाठी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाही अनुदान देण्यात आले होते. आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या दिंड्याना अनूदान देण्याच्या सुचना केल्या आहेत.  

Topics mentioned in this article