Manikrao Kokate: शेतऱ्यांसाठी खूशखबर!राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारला जाणार

या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल, असे निर्देश कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. त्यामुळे तसे झाल्यास शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंत्रालयात  दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, उपाययोजना व सांगली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासंदर्भात आयोजित बैठकीत कृषी मंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, कृषी आयुक्त सूरज मांढरे यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सोलापूर येथे कृषि भवन व बाजारपेठ मॉल उभारण्यात येणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  Solapur News: प्रेमविवाह केला, संसारात हुंड्याचा अडथळा आला, गर्भवती विवाहितेचा शेवट भयंकर झाला

या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल.  शहरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला भाजीपाला, फळे, तृणधान्य, कडधान्य व इतर कृषी आधारित उत्पादने थेट व माफक दरात खरेदी करता येतील. याच धर्तीवर राज्यात देखील कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारण्याचा विचार आहे.  शेतक-यांना याचा फायदा होईल. त्यांचा वेळ वाचून  त्यांना सर्व कृषी माल विक्री आणि कृषीसाठी लागणा-या सर्व सहसाहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल असं कृषी मंत्री यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: 'आश्रमात लग्नासाठी मुली आहेत, रजिस्ट्रेनशसाठी 15,000 भरा', सिंधुताईंच्या नावाने भयंकर घोटाळा

'एक पीक एक गाव' ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी विचाराधीन आहे असं यावेळी कोकाटे म्हणाले. सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठच्या कामांना तात्काळ निधी वितरीत करून या महाविद्यालयाचे काम सुरू करा. यामध्ये दिरंगाई करू नका हे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहे. पण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारण्याचा शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणार आहे.