PM Modi : 'अनावश्यक वक्तव्य करु नका' PM मोदींची कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांना मोठी सूचना

जाहिरात
Read Time: 2 mins
Modi Cabinet : पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांना मोठी सूचना केली आहे.
मुंबई:

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी पंतप्रधानांनी कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच मंत्र्यांना अनेक सूचनाही दिल्या. त्यांनी मंत्र्यांना सांगितले की, त्यांनी आपापल्या मंत्रालयांशी संबंधित नसलेल्या मुद्द्यांवर बोलणे टाळावे. त्याचबरोबर अनावश्यक वक्तव्ये करू नयेत. पंतप्रधानांनी म्हटले की, सर्व मंत्र्यांनी सरकारची अकरा वर्षांची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवावी. त्यांनी आपापल्या मंत्रालयांचे कामकाज आणि उपलब्धींबद्दल लोकांना माहिती द्यावी. तसेच, पत्रकार परिषद घेऊन मंत्रालयाच्या कामांची माहिती द्यावी. NDTV ला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

6,405 कोटी रुपयांच्यां रेल्वे मार्गांना मंजुरी

यापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळाने झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमधून जाणाऱ्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली, ज्यांची एकूण किंमत 6,405 कोटी रुपये आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या (सीसीईए) बैठकीत या दोन्ही रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

मंजूर झालेल्या प्रकल्पांपैकी एक 133 किलोमीटर लांबीच्या कोडरमा-बरकाकाना मार्गाच्या दुहेरीकरणाशी संबंधित आहे. हा मार्ग केवळ झारखंडमधील एका प्रमुख कोळसा उत्पादक क्षेत्रातून जात नाही, तर पटना आणि रांची दरम्यानचा सर्वात लहान आणि अधिक कार्यक्षम रेल्वे संपर्क मार्ग देखील आहे.

दुसरा प्रकल्प 185 किलोमीटर लांबीच्या बेल्लारी-चिकजाजुर मार्गाच्या दुहेरीकरणाचा आहे. हा मार्ग कर्नाटकच्या बेल्लारी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांमधून आणि आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातून जातो.

Advertisement

( नक्की वाचा :  CM Devendra Fadnavis : 'ज्यांना जनता नाकारते, तेच जनादेश नाकारतात', राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचं प्रत्युत्तर )

एका अधिकृत निवेदनानुसार, मंजूर मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे 1,408 गावांपर्यंत रेल्वे संपर्क वाढेल. या गावांची एकूण लोकसंख्या सुमारे 28.19 लाख आहे. सरकारने निवेदनात म्हटले आहे की, 'हे रेल्वे मार्ग कोळसा, लोहखनिज, तयार पोलाद, सिमेंट, खते, कृषी आणि पेट्रोलियम उत्पादनांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यांच्या क्षमतेत वाढ झाल्याने प्रतिवर्षी ४.९ कोटी टन अतिरिक्त मालवाहतूक होईल.'

Advertisement
Topics mentioned in this article