राहुल गांधींनी 1984 च्या शीख विरोधी दंगलींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, काही 'चुका' झाल्या आहेत. त्या घडल्या तेव्हा मी तिथे नव्हतो. मात्र, काँग्रेस पक्षाने पूर्वी केलेल्या कोणत्याही चुकीची जबाबदारी घेण्यास मला कोणतीही अडचण नाही. "दोन आठवड्यांपूर्वी राहुल गांधी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठाच्या वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समध्ये गेले होते. तेथे प्रश्नोत्तराच्या सत्रात एका शीख तरुणाने राहुल गांधींच्या पूर्वीच्या विधानाचा संदर्भ देत त्यांना प्रश्न विचारले. त्याला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपबाबत तुम्ही भीतीचे वातावरण निर्माण करत आहात. तुम्ही म्हणालात की राजकारणात निर्भयता असली पाहिजे. दुसरीकडे शिखांना कडे घालायचे नाही, पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, जे काँग्रेस पक्षाच्या राजवटीत दिले गेले नाही. असा थेट सवाल त्याने राहुल गांधी यांना केला. या प्रश्नालाही राहुल गांधी यांनी उत्तर दिले. त्या तरुणाने आनंदपूर साहिब ठरावात दलित अधिकारांचाही उल्लेख केला.
दरम्यान त्या तरुणाने फुटीरतेचा कोणताही उल्लेख केला नाही. पण शिख दंगलीचा त्याने आवर्जून उल्लेख केला. सज्जन कुमार यांचा ही त्याने उल्लेख केला. ही व्यक्ती शिख हत्याकांडासाठी दोषी ठरवण्यात आले. असे अनेक सज्जन कुमार काँग्रेसमध्ये बसले आहेत. असं ही हा तरुण राहुल गांधी यांना म्हणाला. काँग्रेसने शिखांबरोबर सामंजस्य साधण्याचा प्रयत्न केला नाही. आता तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न करत आहात. तुम्ही असेच करत राहीलात तर पंजाबमध्ये भाजपचा मार्ग मोकळा होईल असं ही तो यावेळी म्हणाला.
यावेळी त्या तरुणाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, "मला वाटत नाही की शीखांना कशाचीही भीती वाटते. मी जे विधान केले ते हे होते की, आपल्याला असा भारत हवा आहे की जिथे लोकांना त्यांचा धर्म व्यक्त करताना अस्वस्थ वाटेल? काँग्रेस पक्षाच्या चुकांबद्दल, त्यापैकी अनेक चुका मी तिथे नसताना झाल्या आहेत. पण काँग्रेस पक्षाने आपल्या इतिहासात केलेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी घेण्यास मी खूप आनंदी आहे. मी सार्वजनिकपणे सांगितले आहे की 80 च्या दशकात जे घडले ते चुकीचे होते, मी अनेकदा सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे, भारतातील शीख समुदायाशी माझे खूप चांगले संबंध आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.