Bengaluru Stampede : 'मलाही इथेच राहायचं आहे', चेंगराचेंगरीत मुलाला गमावलेल्या पित्याने मारली कबरीला मिठी

Chinnaswamy Stadium Stampede : ''माझ्या मुलासोबत जे घडले, ते कोणासोबतही घडू नये," असे त्यांनी कबरीवर डोके टेकवून जमिनीवर झोपून सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bengaluru stampede : बी.टी. लक्ष्मण हसन जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुलाच्या कबरीवर विलाप करतानाची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 
मुंबई:

Chinnaswamy Stadium Stampede : आयपीएल 2025 मध्ये विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी बाहेर पडलेल्या ११ लोकांचा बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर चेंगराचेंगरी होऊन मृत्यू झाला, तर 47 जण जखमी झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपला मुलगा गमावला त्या वडिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत भूमिक लक्ष्मण या 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचे वडील बी.टी. लक्ष्मण हसन जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुलाच्या कबरीवर विलाप करतानाची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 

''माझ्या मुलासोबत जे घडले, ते कोणासोबतही घडू नये," असे त्यांनी कबरीवर डोके टेकवून जमिनीवर झोपून सांगितले. "मी त्याच्यासाठी जी जमीन विकत घेतली होती, तिथेच त्याचे स्मारक बांधले गेले आहे,' असे त्यांनी अत्यंत शोकाकुल अवस्थेत सांगितले. 

मिठी सोडण्यास नकार देताना लक्ष्मण म्हणाले, "मला आता कुठेही जायचे नाही. मलाही इथेच राहायचं आहे," तेवढ्यात इतर दोन पुरुष त्यांच्याजवळ येतात आणि त्यांना उठण्यास मदत करतात. "माझ्यासारख्या परिस्थितीचा सामना कोणत्याही वडिलांना करावा लागू नये.'

इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असलेला भूमिक, बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमलेल्या हजारो लोकांपैकी एक होता. आरसीबी फॅन्सच्या जल्लोषाला दुर्दैवी वळण लागलं. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये भूमिकसह 11 जणांचा मृत्यू झाला. 

Advertisement

या दुर्घटनेनंतर लक्ष्मण यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारला विनंती केली होती की, त्यांच्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनादरम्यान 'कापला' न जाता त्यांना देण्यात यावा.

"माझा एकुलता एक मुलगा होता आणि आता मी त्याला गमावले आहे. कृपया मला त्याचा मृतदेह द्या, शवविच्छेदन करू नका आणि त्याचे शरीर तुकड्यांमध्ये कापू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (दुर्घटनेतील पीडितांना) भेटायला येऊ शकतात, पण ते त्याला परत आणू शकत नाहीत, असे ते त्यांनी रडत-रडत सांगितले होते.