भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील सध्या खराब कालखंड सुरु आहे. पृथ्वी डिसेंबर महिन्यात सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला आहे. त्यानंतर झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला कोणत्याही फ्रँचायझीनं खरेदी केलं नाही. इतकच नाही तर जखमी खेळाडूंच्या बदली त्याला करारबद्ध करण्यासही कुणी उत्सुकता दाखवलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएल 2025 चा सिझन पुन्हा एकदा 17 मे पासून सुरु होत आहे. पृथ्वीनं त्यापूर्वी एक रहस्यमयी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलीय. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पृथ्वीच्या मनात नेमकं काय सुरु आहे? हा प्रश्न या पोस्टमधून विचारला जात आहे.
पृथ्वी शॉनं 'मला ब्रेक हवाय' अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शॉ सध्या अवघड कालखंडातून जात आहे का? तो त्याच्या करियरमध्ये काही बदल करणार आहे का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
पृथ्वी शॉ ला एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भविष्य मानले जात असे. पण, खराब फॉर्म आणि फिटनेसच्या प्रश्नामुळे त्याच्या कारकिर्दीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या दरम्यान पृथ्वी फिटनेसच्या समस्येमुळेच मुंबई टीममधून वगळण्यात आले होते. टीममधून वगळण्यापूर्वी त्याचा फॉर्मही साधारण होता. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पृथ्वी शॉनं त्याची बेस प्राईज 75 लाख निश्चित केली होती. त्यानंतरही त्याला कोणत्याही फ्रँचायझीनं खरेदी केलं नाही.