पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान परदेशी पाहुण्यांचे अपहरण करण्याचा कथित कट उघड केला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये सुरक्षेबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहवालानुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), आयसिस आणि बलुचिस्तानस्थित गटांसारख्या अनेक दहशतवादी संघटनांनी हा इशारा दिला आहे. यानंतर, पाकिस्तान सुरक्षा दलांनी रेंजर्स आणि स्थानिक पोलिसांसह उच्चस्तरीय सुरक्षा दल तैनात केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत सरकारने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिल्याने भारत आपल्या संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळत आहे. जर भारत उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत पोहोचला तर दोन्ही सामने दुबईमध्ये होतील.
(नक्की वाचा- IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video)
पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांदरम्यान सुरक्षा हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. 2009 मध्ये श्रीलंकन संघावर झालेल्या हल्ल्यानंतर ही चिंता अधिक वाढली आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) इतर पाहुण्या संघांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपायांचा दावा केला आहे.
( नक्की वाचा : Champions Trophy :मोहम्मद शमीसारखं कुणी नाही, जग 'या' रेकॉर्डसाठी ठेवणार लक्षात )
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था
रिपोर्ट्सनुसार, लाहोर आणि रावळपिंडी येथील सामन्यांदरम्यान 12,000 पोलीस अधिकारी तैनात केले जातील. ज्यात 18 वरिष्ठ अधिकारी, 54 डीएसपी, 135 निरीक्षक, 1,200 उच्च अधिकारी, 10,556 कॉन्स्टेबल आणि 200 महिला पोलीस अधिकारी असतील. याव्यतिरिक्त, PCB ने खेळाडू आणि इतर हाय-प्रोफाइल पाहुण्यांसाठी विशेष चार्टर फ्लाइटची व्यवस्था केली आहे, जी कराची, इस्लामाबाद आणि लाहोर दरम्यान धावेल.