IPL 2025 Final : बघा पटतंय का! यंदाची IPL कोण जिंकणार? मायकल क्लार्कने वर्तवले भाकीत

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Michael Clarke picks the winner of IPL 2025 : मुंबई इंडियन्सला क्वालिफायर 2 मध्ये पराभूत करून पंजाब किंग्सने (MI vs PBKS) फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये पंजाब सुपरकिंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. (IPL Final 2025 PBKS vs RCB) जिथे त्यांचा सामना आरसीबीशी होईल. पंजाब किंग्स फायनलमध्ये पोहोचताच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने केलेली एक भविष्यवाणी चर्चेचा विषय बनली आहे. मायकल क्लार्कने अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या 2 संभाव्य टीमची नावे आधीच जाहीर केली होती. त्याने म्हटले होते की IPL 2025 च्या अंतिम फेरीत RCB आणि MI या दोन संघांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. त्याची अर्धी भविष्यवाणी खरी ठरली असून आरसीबीने अंतिम फेरी गाठली आहे मात्र मुंबई इंडियन्स संघ फायनलमध्ये धडक मारू शकला नाही. क्लार्कने आयपीएल फायनल कोण जिंकेल याबाबतही भविष्यवाणी केली होती, मात्र मुंबईचा संघ फायनलमध्ये न पोहोचल्याने मायकल क्लार्कने वर्तवलेल्या भाकितावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 

मायकल क्लार्कने म्हटलं आहे, "आरसीबी हा एक असा संघ आहे ज्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो, RBC च्या संघात X फॅक्टर अधिक दिसून येत आहे म्हणजेच या संघाची जिंकण्याची संधी अधिक प्रबळ आहे. क्लार्कने म्हटलंय की अंतिम सामन्यात Mumbai Indians सारख्या प्रबळ संघाचे आव्हान नसल्याने आरसीबीची जिंकण्याची संधी अधिक वाढली आहे.  अंतिम फेरीत मुंबई इंडीयन्सचा संघ नसल्याने आरसीबी फायनल जिंकू शकते."

Advertisement

नक्की वाचा : आयपीएल 2025 चा फायनल एकदम खास! 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार

3 जून रोजी अहमदाबादमध्ये आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात IPL चा अंतिम सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांपैकी कोणताही संघ अंतिम विजेतेपद जिंकल्यास आयपीएलला नवीन विजेता मिळेल. क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीने पंजाबला हरवून फायनलमध्ये धडक मारली होती, तर क्वालिफायर 2 मध्ये पंजाबने मुंबईला हरवून फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.  यामुळे आयपीएलप्रेमी आता अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.  

Advertisement

श्रेयस अय्यरची जबरदस्त खेळी

पंजाब किंग्सने आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सने कर्णधार श्रेयस अय्यरच्या 87 धावांच्या स्फोटक नाबाद खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला पाच गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. पंजाब किंग्सला विजयासाठी 204 धावांची गरज होती. श्रेयस अय्यरने 41 चेंडूत आठ षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने केलेल्या 87 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने 19 षटकांत पाच गडी गमावून 207 धावा करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रेयस अय्यरने 19 व्या षटकात युवा डावखुरा गोलंदाज अश्विनी कुमारला चार षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. अय्यरने नेहल वढेरा (48) सोबत चौथ्या गड्यासाठी 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
 

Advertisement