मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात उद्याही पावसाचा जोर कायम राहणार आहे. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, रायगड, आणि रत्नागिरीला उद्या ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय. गेले दोन दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावस कोसळतोय. या सगळ्याचा परिणाम मुंबईतल्या रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर दिसतोय...पुढचे तीन दिवस म्हणजे शनिवारपर्यंत मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.