अरबी समुद्राला २४ ते २८ जूनपर्यंत मोठी भरती असून यावेळी ४.५९ ते ४.७५ मीटर उंचीच्या महाकाय लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या पाच दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडला तर शहर जलमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई शहर सात बेटांवर नवसले असल्यामुळे पावसाळ्यात न समुद्राचा धोका कायम आहे. २ समुद्राला मोठी भरती असताना - पावसाळ्यात मुंबईतून समुद्रात निचरा होणाऱ्या पाण्याच्या - पातमुखावरील दरवाजे बंद करण्यात येतात.अशावेळी मुंबईत मुसळधार पाऊस पडला, तर मुंबईत पाणी तुंबून राहते. त्यामुळे पावसाळ्यात अरबी समुद्राला असलेल्या मोठ्या भरतीच्या वेळी शहर जलमय होण्याची दाट शक्यता असते. येत्या काही दिवसांत मुंबईत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे जूनमध्ये समुद्राला असलेल्या मोठ्या भरतीमुळे महापालिका सतर्क झाली आहे.