नाशिकमधील 400 कोटींच्या कथित कंटेनर लूट आणि अपहरण प्रकरणाने आता एक नवीन वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य तक्रारदार संदीप पाटील यांनी 'NDTV मराठी'शी बोलताना नाशिक ग्रामीण पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी सर्व पुरावे असूनही हे प्रकरण दाबल्याचा दावा पाटील यांनी केला असून, आता या प्रकरणाचा तपास CID कडे गेल्याने सत्य बाहेर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.