शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुक्यातील उखळद बाभळी गावात शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले आहे, यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी देणार नाहीत असा लेखी पंचनामा करून शासनाकडे पाठविण्यासाठी भाग पाडले आहे. परभणी जिल्ह्यातुन एकूण ७१ किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर सुपीक जमिनी जाणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मागील आठवड्यापासून विरोध दर्शविला आहे तसेच महाराष्ट्रात 14 ठिकाणी तर चार ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको देखील केला होता, यावेळी उखळद बाभळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते....