रत्नागिरीमधील प्रस्तावित वाटद MIDC ला ग्रामस्थांनी विरोध केलाय. या MIDC साठी जमीन अधिग्रहित करण्याबाबत ग्रामस्थांना प्रशासनाकडून नोटिसा आलेल्या आहेत. MIDC साठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी प्रशासनानं कळझोंडी, वाटद, मिरवणे, कोळीसरे तसंच गडनरळ इथल्या ग्रामस्थांचं मत मागवलंय.