आयपीएल दोन हजार पंचवीस च्या अंतिम सामन्यामध्ये आरसीबी आणि पंजाब किंग्ज जेतेपदासाठी भिडणार आहेत. दोन्ही संघांनी या हंगामामध्ये शानदार खेळी करत अंतिम फेरी गाठली आहे. आज आयपीएल ला एक नवीन विजेता मिळणार आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदाही आयपीएल चे जेतेपद जिंकलेलं नाही. दोन्ही संघ गेल्या अठरा वर्षांपासून लीगमध्ये खेळतायत. परंतु जेतेपदानं त्यांना हुलकावणी दिली आहे.