महायुतीत बिनसणार की महायुती घट्ट राहणार हे पुढच्या काही दिवसांतच कळणार आहे.... कारण महापालिका निवडणुकीसाठी जागावाटप ही महायुतीसमोरची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरणार आहे... गेल्या वेळी भाजप आणि शिवसेना हे दोनच पक्ष होते, तरीही त्यांची युती होऊ शकली नाही आता तर अजित पवारांच्या रुपानं दोघांमध्ये तिसराही आलाय... हे कमी की काय म्हणून रिपाइंचे आठवलेही म्हणतायत आम्हाला मुंबईत वीस जागा द्या.... तर शिंदे म्हणतात शंभरपेक्षा कमी जाागा घेणार नाही... हा सगळा गोंधळ महायुती कसा निस्तरणार.... पाहुया...