Shocking: धक्कादायक! भारतीय तरुणीचा चीनमध्ये 18 तास छळ, शांघाय एअरपोर्ट बनवले 'कैदखाना', प्रकरण काय?

चीनी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर थोंगडोक यांना अन्न, पाण्याची सुविधा आणि त्यांच्या स्थितीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

चीनमध्ये एका भारतीय महिलेला तिच्या जन्मस्थानावरून 18 तासांहून अधिक काळ शांघाय विमानतळावर (Shanghai Airport) रोखून ठेवल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पेमा वांग थोंगडोक या भारतीय मुलीने  चीनी अधिकाऱ्यांवर छळ आणि अपमानाचे आरोप केले आहेत. 21 नोव्हेंबर 2025 रोजी घडलेल्या या घटनेमुळे भारताच्या सार्वभौमत्वाचा (Sovereignty) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमके काय घडले?
थोंगडोक या लंडनहून जपानला जात असताना, 3 तासांच्या थांब्यासाठी शांघाय पुडोंग विमानतळावर (Shanghai Pudong Airport) पोहोचल्या. येथील इमिग्रेशन (Immigration) अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट 'अवैध' ठरवला. कारण म्हणून, त्यांच्या पासपोर्टवर जन्मस्थान अरुणाचल प्रदेश नमूद होते. चीन अरुणाचल प्रदेशला 'जंगनान' म्हणून आपला भूभाग मानत असल्याने, अधिकाऱ्यांनी थोंगडोक यांची भारतीय नागरिकता मान्य करण्यास नकार दिला. त्यांना सुमारे 18 तास चायना ईस्टर्न एअरलाईन्स (China Eastern Airlines) कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात ठेवण्यात आले.

अमानवी वागणूक आणि आर्थिक नुकसान
चीनी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर थोंगडोक यांना अन्न, पाण्याची सुविधा आणि त्यांच्या स्थितीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. उलट, अनेक अधिकाऱ्यांनी त्यांचा अपमान केला. शिवाय चिनी पासपोर्टसाठी अर्ज करण्याचा उपहासात्मक सल्ला दिला. वैध जपानी व्हिसा असूनही, त्यांना पुढील विमानाने प्रवास करण्यापासून रोखण्यात आले. शेवटी, लंडन येथील मित्राच्या माध्यमातून शांघाय येथील भारतीय वाणिज्य दूतावासाशी (Indian Consulate) संपर्क साधल्यानंतरच त्यांना विमानतळ सोडता आले. तिकीट रद्द झाल्याने आणि नवीन तिकीट खरेदी करावे लागल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

नक्की वाचा - D Mart News: डी मार्टमध्ये 'या' दिवशी मिळतं सर्वात स्वस्त सामान, त्यामागचं कारणं ऐकून तुम्ही ही खूश व्हाल

Advertisement

भारताचे कठोर मत
या घटनेला थोंगडोक यांनी 'भारताच्या सार्वभौमत्वाचा थेट अपमान' म्हटले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भारतीय अधिकाऱ्यांनी चीनकडे याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची व नुकसान भरपाईची मागणी करण्याची विनंती केली आहे. यापूर्वी, भारताने चीनकडून अरुणाचल प्रदेशातील स्थळांचे नामकरण करण्याच्या 'निरर्थक' प्रयत्नांना वेळोवेळी फेटाळले आहे. भारताच्या विदेश मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अरुणाचल प्रदेश हा 'भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमी राहील.' या प्रकरणानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत.