तुर्कमेनिस्तानमधील कारकुम वाळवंटातील एका महाकाय खड्ड्यात 50 वर्षांपासून आग लागली आहे. पृथ्वीच्या पोटात लागलेली ही आग गेल्या 50 वर्षात विझलेली नाही. म्हणूनच ही जागा नराकाचं द्वार म्हणून जगात प्रसिद्ध आहे. मात्र आता ही आग विझायला लागली आहे. शास्रज्ञांच्या मते आगीचं प्रमाण आधीच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश राहिलंय आणि येत्या काही दिवसात ती आगही नाहिशी होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नरकाचं हे द्वार म्हणजेच गेट वे टू हेल 1971मध्ये तयार झालं तेव्हाची कथा मोठी गमतीशीर आहे. तुर्मेनिस्तान हा सोव्हियट रशियाचा भाग होता तेव्हाची ही गोष्ट आहे. रशियन शास्त्र अणूचाचण्यासाठी मोठ मोठे खड्डे करीत होते. तुर्कमेनिस्तानच्या कारकुम वाळवंटात असाच भला मोठा खड्डा खणला जात
होता. पण भूगर्भात खोल जात असताना अचानक नैसर्गिक गॅसचे साठे लागले. हे साठे मिथेनसारख्या प्रदूषण पसरवणाऱ्या गॅसचे साठे असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं.
नक्की वाचा - World Enviorenment Day 2025 : जागतिक पर्यावरण दिनाबद्दलच्या 5 Interesting गोष्टी माहिती आहेत का ?
चूक लपवण्यासाठी मग शास्त्रज्ञांनी खड्डा खणणं थांबवलं आणि जिथून गॅस बाहेर येणार होता तिथे आग लावली. भूगर्भातून गॅस बाहेर येत राहिला. गॅसचा फ्लो वाढला की, आगीचा भडका व्हायचा. हे दृश्य इतकं विलक्षण असतं की हळूहळू हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनत गेलं. सध्या जगातल्या काही दुर्मीळ पर्यटन स्थळापैकी एक म्हणून नरकाचं द्वार प्रसिद्ध आहे.
विज्ञानाच्या जोरावर निसर्गावर मात करण्याची माणसाची अभिलाशा गेल्या दोन तीन शतकात बळावलीय. पण माणसानं कितीही प्रगती केली तरी निसर्गावर मात करण्याचे त्याचे प्रयत्न प्रत्येक वेळी तोकडे पडतात. गेट वे टू हेल हे त्याचंच एक उदाहरण आहे.