
भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मध्ये पाकिस्तानचं जे नुकसान केलंय ते शेजारचा देश अनेक पिढ्या लक्षात ठेवणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ( Pakistan PM Shehbaz Sharif ) यांनी पुन्हा एकदा भारतानं केलेल्या हल्ल्याची जाहीर कबुली दिली आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या दाव्यानुसार भारतीय क्षेपणास्त्रांनी 9 आणि 10 मे रोजी पाकिस्तानमधील अनेक लक्ष्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांचं नुकसान झालं. किस्तानी पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, ते पहाटे 4.30 वाजता - त्यांच्या फजरच्या नमाजानंतर - भारतावर हल्ला करण्याची योजना आखत होते, परंतु त्यापूर्वीच भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा हल्ला करत रावळपिंडीतील विमानतळासह पाकिस्तानमधील अनेक प्रांतांना लक्ष्य केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
अझरबैजानमध्ये एका भाषणादरम्यान शरीफ म्हणाले, '9-10 मेच्या रात्री, आम्ही भारतीय आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. आमच्या सशस्त्र दलांनी पहाटे 4:30 वाजता फजरच्या नमाजानंतर धडा शिकवण्यासाठी तयारी केली होती. परंतु ती वेळ येण्यापूर्वीच भारताने पुन्हा एकदा ब्राह्मोसचा वापर करून क्षेपणास्त्र हल्ला केला आणि रावळपिंडीतील विमानतळासह पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतांना लक्ष्य केले."
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत हे हल्ले केले होते. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर लष्करी हल्ला होता,
या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी याबाबतचे कबुली दिली होती. भारतीय क्षेपणास्त्रांनी 10 मे रोजी पहाटेच्या सुमारास नूर खान एअरबेस आणि पाकिस्तानमधील इतर लक्ष्यांवर हल्ला केला होता, हे त्यांनी मान्य केलं होतं. ते म्हणाले होते की, '9-10 मेच्या मध्यरात्री, पहाटे सुमारे 2:30 वाजता, जनरल पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांनी मला एका सुरक्षित फोनवरून कॉल केला आणि सांगितले की भारताने त्यांची क्षेपणास्त्रे डागली आहेत. एक नूर खान एअरबेसवर पडले आहे आणि काही इतर ठिकाणी सोडले आहेत.
( नक्की वाचा : पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! 227 प्रवाशांचा जीव होता धोक्यात तरीही नाकारली लँडिंगची परवानगी )
भारत सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , भारतीय हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी गटांशी संबंधित सुमारे 100 दहशतवादी मारले गेले. भारतीय सशस्त्र दलांनी नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले - चार पाकिस्तानमध्ये (भावलपूर, मुरिदके, सरजल आणि मेहमूना जोया) आणि PoK मधील (सवाई नाला, सय्यदना बिलाल, गुलपूर, बरनाला आणि अब्बास) पाच ठिकाणांचा समावेश होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world