Palghar News: बियाणे खरेदी केलं, तरच खत देणार; कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

पालघरमधील बहुतांशी शेतकरी हे मागील वर्षीच काही प्रमाणात बियाणं राखून ठेवतात. मात्र अशा शेतकऱ्यांना या कृषी सेवा केंद्राकडून खत दिले जात नसल्याने या शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

मनोज सातवी, पालघर

Palghar News : पालघरच्या ग्रामीण भागात कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे . शेतकऱ्यांना खत देण्यास कृषी सेवा केंद्राकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. आमच्याकडून भाताचे बियाणे खरेदी केलं असेल तरच खत देणार असा, अजब प्रकार पालघरमधील ग्रामीण भागात असणाऱ्या कृषी केंद्रांकडून सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पालघरमधील बहुतांशी शेतकरी हे मागील वर्षीच काही प्रमाणात बियाणं राखून ठेवतात. मात्र अशा शेतकऱ्यांना या कृषी सेवा केंद्राकडून खत दिले जात नसल्याने या शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.  त्यातच अनेक ठिकाणी एमआरपी पेक्षाही जास्त भावात खत विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

(ट्रेंडिंग बातमी - Iran Attacks Israel : इराणचा इस्त्रायलवर जोरदार प्रहार, 10 ठिकाणांवर हल्ला)

मात्र आम्ही ठिकठिकाणी कृषी सेवक नेमले असून अशा तक्रारी असतील तर त्यांच्यावर योग्य कारवाई करू केली जाईल, असं सांगत कृषी विभागाने या गंभीर प्रकाराकडे डोळे झाक केल्याचं पाहायला मिळत आहे.

Topics mentioned in this article