जाहिरात

Dahanu News: रेल्वेचे इंजिन सुसाट पुढे गेले, 2 डब्बे मागेच राहिले, अमृतसर एक्सप्रेसचा थरकाप उडवणार प्रसंग

परिणामी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या विलंबाने धावल्या. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

Dahanu News: रेल्वेचे इंजिन सुसाट पुढे गेले, 2 डब्बे मागेच राहिले, अमृतसर एक्सप्रेसचा थरकाप उडवणार प्रसंग
डहाणू:

मनोज सातवी 

पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे दोन डबे वेगळे झाल्याचे घटना घडली आहे. मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्सप्रेसचे डबे निघाले होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण पसरले होते. लागलीच प्रवाशी  या एक्सप्रेसमधून खाली उतरले. ते रूळा शेजारी उभे राहीले होते. बऱ्याच अंतरावर हे दोन्ही डब्बे होते. त्यामुळे प्रवाशी मदत कधी मिळेल याची वाट पाहात रुळा शेजारी उभे असल्याचं दिसून आलं आहे. त्याचा एक व्हिडीओ ही समोर आला आहे. त्यात इंडिन पासून डब्बे वेगळे झाल्याचे दिसत आहे. शिवाय प्रवाशाही रुळावर उतरलेले दिसत आहे.  डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवर त्याचा नक्कीच परिणाम झाला आहे. डाऊन मार्गावरील वाहतूक चाळीस मिनिटं ठप्प झाली होती. काही वेळाने याच अमृतसर एक्सप्रेसचे डबे जोडून गाडी गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.  

पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्थानकाजवळ आज एक मोठी घटना टाळली. मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या अमृतसर एक्सप्रेसच्या दोन डब्यांचा अचानक गाडीतून तुटून वेगळा झाल्याचा प्रकार घडला. गाडी वेगात असताना डबे वेगळे झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तात्काळ कार्यवाहीमुळे आणि गाडीतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. घटनेनंतर डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक जवळपास चाळीस मिनिटे ठप्प झाली. 

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचे नाव जवळपास निश्चित, 'या' नावावर निर्णय शेवटच्या टप्प्यात

परिणामी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या विलंबाने धावल्या. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी कर्मचारी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. वेगळे झालेले डबे पुन्हा गाडीला जोडण्यात आले आणि गाडी पुढे गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवाशांना झालेल्या भीतीचा धसका अद्याप कायम आहे. 

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट

रेल्वेच्या सुरक्षाविषयक बाबींकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनीही या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डहाणू परिसरात झालेल्या या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने गंभीर दुर्घटना टळली असली तरी प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com