Mumbai Latest news: हिंदी बोलता न आल्याने एकाला अटक, मुंबई विमानतळावर मोठा ड्रामा

Hindi Language: अधिकाऱ्यांना तरीही या माणसावर संशय येत असल्याने त्यांनी त्याला हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले. यावर त्याने आपल्याला हिंदी येत नाही असे सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन तपासणीदरम्यान म्यानमारच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे बोगस कागदपत्रे सापडली असून या कागदपत्रांच्या आधारे तो भारतात राहात होता. हा माणूस भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहात असल्याचे उघड झाले आहे.  अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव यू थांग सोए लियान (वय 34) असून, तो भारतामध्ये 'बोइतलुंग सायमन' हे खोटे नाव धारण करून राहात होता. 

(नक्की वाचा: विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात? गुप्तहेराचे 14 दिवस वसतिगृहात बेकायदेशीर वास्तव्य, लेक्चर्सना हजेरी)

'यू' कसा अडकला ?

यू थांग सोए लियान याच्यावर संशय आल्याने विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याला रोखले आणि त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपण मिझोरामचा रहिवासी असल्याची थाप मारली होती. अधिकाऱ्यांना तरीही त्याच्यावर संशय येत असल्याने त्यांनी त्याला हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले. यावर त्याने आपल्याला हिंदी येत नाही असे सांगितले. ज्यामुळे तो बेकायदेशीररित्या भारतात राहात असल्याची अधिकाऱ्यांना खात्री पटली होती. अधिकाऱ्यांनी त्याला मिझोरामबद्दलची माहिती विचारली होती, त्याचीही त्याला उत्तरे देता आली नव्हती.  

Advertisement

(नक्की वाचा:बुरख्यात घरी आला तौफिक 'भाईजान', राखी बांधणाऱ्या नेहाला पाचव्या मजल्यावरुन फेकले! कारण काय?)

मिझोरामबद्दलही काही माहिती नाही

सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  थांग मलेशियाला जाणाऱ्या विमानात चढण्याच्या प्रयत्नात होता. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली. त्याच्या पासपोर्टमध्ये तो मिझोरममधील आइझॉलचा रहिवासी असल्याचे म्हटले होते. थांग याला मिझोरामबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले मात्र त्याची तो उत्तरे देऊ शकला नाही. त्याला तोडकं मोडकं इंग्रजी येत होतं, मात्र त्याची इंग्रजी बोलण्याची ढब ऐकल्यानंतर तो मिझोरामचा नसावा याची अधिकाऱ्यांना मनोमन खात्री पटली होती. थांग याला हिंदीत बोलायला सांगितले असता त्याला हिंदीचा एक शब्दही बोलता आला नव्हता. यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात आली. 

Advertisement

अटक वॉरंट जारी झाल्याने म्यानमारमधून पळाला

चौकशीदरम्यान थांगने सांगितले की तो मूळचा म्यानमारचा रहिवासी आहे.  2019 मध्ये तिथल्या सरकारविरोधी निदर्शने झाली होती. थांगने या विरोधप्रदर्शनात भाग घेतला होता. त्यामुळे त्याला अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते. मध्ये सहभागी झाल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाले होते. त्यानंतर तो देश सोडून पळाला. तिथून आल्यानंतर तो दिल्लीत येऊन राहात होता. दिल्लीमध्ये तालिब नावाच्या पासपोर्ट एजंटच्या मदतीने त्याने बनावट पासपोर्ट बनवला होता आणि इतर कागदपत्रेही मिळवली होती.  या कागदपत्रांच्या आधारे तो भारतात राहात होता. त्याने या पासपोर्टच्या आधारे परदेशवारीही केली होती. थांगला बोगस कागदपत्रे बनविण्यासाठी कोणी कोणी मदत केली होती याचीही चौकशी केली जात आहे.  
 

Advertisement
Topics mentioned in this article