Ketan Agarwal: केतननं 2 गोष्टी लपवल्या म्हणून सियानं हत्या केली? 'त्या' चर्चेवर केतनच्या वडिलांनी दिलं उत्तर

Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडामध्ये रोज नवनवीन आणि खळबळजनक खुलासे होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ketan Agarwal Murder Case: केतनच्या वडिलांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
पुणे:

Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडामध्ये रोज नवनवीन आणि खळबळजनक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाला एक पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या 'विग आणि बोलताना अडखळणे' या थ्योरीवर मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत या संपूर्ण प्रकरणामागे केवळ रूप-रंग हे कारण नसून, एखादा मोठा आणि गडद कट असण्याची भीती व्यक्त केली आहे. वडिलांच्या या थेट भूमिकेमुळे आता या हायप्रोफाईल मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

काय आहे पोलिसांची थ्योरी?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आणि केतनची भावी पत्नी सिया गोयल या लग्नामुळे प्रचंड नाराज होती. तिला केतनचे रूप-रंग आणि शारीरिक बनावट अजिबात आवडत नव्हती. तपासात असे समोर आले होते की, केतनच्या डोक्यावर विग असणे आणि बोलताना अडखळणे यामुळे सियाच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला होता. याच वैयक्तिक रागातून आणि मानसिक तणावातून सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून देण्याचा थरारक कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.

Advertisement

( नक्की वाचा : महाल बुकींग आणि प्रायव्हेट जेटची चर्चा विसरा, पुण्याच्या केतन अग्रवाल हत्याकांडात सियाने टाकला नवा डाव )
 

केतनच्या वडिलांनी काय सांगितलं?

केतनच्या शारीरिक ठेवण आणि विगबाबत येणाऱ्या बातम्यांवर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी अत्यंत भावुक आणि संतप्त शब्दांत आपली बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, काही वैद्यकीय कारणांमुळे केतनच्या डोक्यावर एका छोट्या भागात केस गळतीची समस्या होती. ही गोष्ट नाते पक्के होण्याच्या खूप आधीच सिया आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला स्पष्टपणे सांगण्यात आली होती. 

कोणतीही गोष्ट लपवून ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे  सियाला खरोखरच केतनच्या दिसण्यावरून किंवा विगवरून काही अडचण होती, तर ती या लग्नाला थेट नकार देऊ शकत होती. लग्न मोडणे हा एक सोपा मार्ग होता, पण त्यासाठी एखाद्याचा थेट खून करणे ही गोष्ट मनाला पटणारी नाही, असा रोखठोक सवाल वडिलांनी केला आहे.

( नक्की वाचा : Ketan Agarwal Murder: सियाचे आई-वडील पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, केतनबाबत झाले हळवे तर लेकीबद्दल म्हणाले... )

मोठ्या कटाची शंका

अग्रवाल कुटुंबाच्या मते, एवढ्या अमानुष आणि क्रूर हत्येमागचे कारण इतके किरकोळ असूच शकत नाही. विग किंवा बोलण्यात अडखळणे ही केवळ दिशाभूल करणारी कारणे पुढे केली जात असून, या हत्येच्या मागे नक्कीच काहीतरी मोठा कट आहे. या संपूर्ण कटात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याशिवाय आणखी काही लोकांचाही हात असण्याची दाट शक्यता वडिलांनी वर्तवली आहे. सध्या पोलीस या दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करत असून, या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूचा तपास केला जात आहे.