1 month ago

Latest News Update :  बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजतंय. या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडला अटक झाली. धनंजय मुंडेवरही आरोप होत आहेत. या आरोपानंतर मुंडे यांना मंत्रिपद सोडावं लागलं. 

या संपूर्ण गदारोळात धनंजय मुंडे प्रसिद्धी माध्यमं तसंच जाहीर कार्यक्रमापासून दूर आहेत. ते विधीमंडळ अधिवेशनात गैरहजर होते. तसंच पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यातही ते अनुपस्थितीत होते. धनंजय मुंडे यांनी स्वत: आपण आजारी असल्यानं पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात येऊ शकलो नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं. पण, त्यानंतरही त्यांच्या आजारावर उलट-सुलट चर्चा सुरुच होती.

Apr 19, 2025 22:47 (IST)

Live Update : चित्रपट निर्माता अनुराग कश्यपच्या विरोधात FIR दाखल

चित्रपट निर्माता अनुराग कश्यपच्या विरोधात दिल्लीमध्ये FIR दाखल करण्यात आली आहे. अनुरागनं सोशल मीडियावरुन ब्राह्मणांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Apr 19, 2025 21:24 (IST)

Live Update : अंबरनाथमध्ये रासायनिक कंपनीला भीषण आग

अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  मोरीवली एमआयडीसीत स्पीड इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीत पोटॅशियम परमॅग्नेटचं उत्पादन केलं जातं. 

या कंपनीत  संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास रासायनिक प्रक्रियेदरम्यान आग लागली. कंपनीत केमिकलचा मोठा साठा असल्यामुळे काही क्षणातच ही आग भडकली आणि कंपनीत मोठमोठे स्फोट होऊ लागले. मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कंपनीच्या बाहेर पळ काढल्याने कुणालाही इजा झाली नाही. 

या आगीनंतर कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या कंपनीकडे इन ऑरगॅनिक कंपाऊंड प्रोडक्शन लायसन्स असून त्यामध्ये ज्वलनशील रसायनांचा समावेश नसतो. मात्र तरीही कंपनीने डाय इथाईल ऑगझोलेट, इथाईल अल्कोहोल यांसारखे ज्वलनशील ऑरगॅनिक केमिकल कंपनीत ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे कंपनीत मूळ उत्पादन सोडून दुसरंच उत्पादन सुरू होतं का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Apr 19, 2025 19:26 (IST)

Live Update : राज -उद्धव ठाकरेंच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज आणि उद्धव  या ठाकरे बंधूंच्या एकाच दिवशी आलेल्या वक्तव्यामुळे ही चर्चा सुरु झालीय. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 19, 2025 17:25 (IST)

तनिषा भिसे मृत्यू प्रकरण! डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होणार

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण 

मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर 

ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉ. घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर 

डॉ.घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

ससुन समितीचा दुसरा अहवाल अखेर समोर

Advertisement
Apr 19, 2025 16:28 (IST)

Nashik News: पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 39 जणांना कोर्टात केले हजर

- 39 जनांनी पैकी एक नवीन संशयित आरोपीला नाशिक कोर्टात हजर करण्यात आले

- आतापर्यंत 39 जणांना पोलिसांकडून अटक 

- सलग तीन दिवस पोलिसांकडून कारवाई सुरू आहे

- आज काही दगडफेक करणाऱ्या आरोपींची पोलीस कोठडी संपणार असल्याने कोर्टात हजर करण्यात आले

- एकूण पंधराशे अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 

- यामध्ये काही राजकीय व्यक्तींवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत 

- या प्रकरणी आज काहींची पोलीस कस्टडी संपत असून काही नवीन संशयित देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे..

- दरम्यान नाशिक कोर्टामध्ये पोलिसांचा प्रचंड असा बंदोबस्त असून 39 संशयितांना हजर करण्यात आले होते..

- यामधे आज एक नवीन संशयित आरोपी सुधा आहे

Apr 19, 2025 16:26 (IST)

LIVE Updates: श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रकिनारी पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील शेतकरी कामगार पक्षाचे तालुका सरचिटणीस तसेच शेकप नेते माजी आमदार  जयंत पाटील यांचे खंदे समर्थक संतोष पाटील यांचे सुपुत्र व नवी मुंबई येथील  त्यांच्या कडे आलेला पाहुणा श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावालगत असलेल्या समुद्रकिनारी पोहण्यास गेले असता. पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात वाहत गेल्याने एकमेकांना  वाचविण्याच्या नादात अवधूत संतोष पाटील, वय २५. मयुरेश संतोष पाटील, वय २१. सख्खे भाऊ दोघे रा. गोंडघर ता. म्हसळा तसेच हिमांशु संतोष पाटील, वय 21, रा. ऐरोली नवी मुंबई यांचा बुडून मृत्यू झाला.

स्थानिक नागरिक व स्पीड बोट चालक यांच्या मदतीने मृतदेह बाहेर पाण्याबाहेर काढण्यात आले.  सदरील मतदेहांचे शव विच्छेदन उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे केल्यानंतर मृतदेह नातेवाईका कडे सुपूर्द करण्यात आले.  

Advertisement
Apr 19, 2025 15:24 (IST)

धोका देणाऱ्या लोकांवर कोणत्या मुद्द्यावर विश्वास ठेवायचा- संदीप देशपांडे

मनसे नेते संदीप देशपांडे म्हटलं की, शिवसेनेने २०१४ आणि २०१७ मध्ये आम्हाला धोका दिला. शिवसेनेचे जे आज शत्रू आहेत, २०१९ पर्यंत ते नव्हते. तोपर्यंत शिवसेनेसाठी भाजप चांगला होता. मात्र २०१९ नंतर त्यांचं फिस्कटलं त्यानंतर भाजप महाराष्ट्रद्रोही झाला. तोपर्यंत भाजप कसा आहे माहित नव्हतं का? त्यानंतर भाजपसोबत युती तोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 

माझा सरळ प्रश्न आहे जर उद्धव ठाकरेंना युतीत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर त्यांच्यासाठी भाजप महाराष्ट्र द्रोही असता का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. ज्या लोकांनी भाजपला धोका दिला. जे लोक आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेस धोका देण्याच्या तयारीत आहेत. एवढा धोका देणाऱ्या लोकांवर कोणत्या मुद्द्यावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याला पडतो, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटल. 

Apr 19, 2025 13:42 (IST)

उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

- किरकोळ भांडणं दूर ठेवायला मी देखील तयार 

- महाराष्ट्र हितासाठी वाद मिटवण्यास तयार 

- राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद

Advertisement
Apr 19, 2025 13:41 (IST)

Live Update : किरकोळ भांडणे दूर ठेवायला मीही तयार, राज यांच्या विधानावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

किरकोळ भांडणे दूर ठेवायला मीही तयार, राज यांच्या विधानावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Apr 19, 2025 13:06 (IST)

राजकारणात कधी काय घडेल, सांगता येत नाही- राज ठाकरे

मी मराठी माणूस, महाराष्ट्राबद्दल जे बोलू शकतो, करु शकतो ते कुणी करु शकेल माहिती नाही. भाजपसोबत मी एकत्र येणे हे राजकीय होऊ शकतं. मात्र आमच्या सगळ्याचं गोष्टी जुळतील असं नाही. राजकारणात कधी काय घडेल, सांगता येत नाही. राजकारणात सतत बदल होत असतात. आता तर राजकारण वेगाने बदलत आहेत. 

Apr 19, 2025 13:05 (IST)

असे अनेक लोक आहेत जे भाजपला मतदान करतात, मात्र काही लागलं की मनसेकडे येतात.

राज ठाकरे

असे अनेक लोक आहेत जे भाजपला मतदान करतात, मात्र काही लागलं की मनसेकडे येतात. 

Apr 19, 2025 12:14 (IST)

रायगडच्या श्रीवर्धनमधील वेलास बीचवर तिघांचा बुडून मृत्यू

रायगडच्या श्रीवर्धनमधील वेलास बीचवर तिघांचा बुडून मृत्यू

शेकापचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांचे दोन युवा चिरंजीव तसेच एक नातेवाईक हे समुद्रात पोहायला गेला असता घडली दुर्घटना

तात्काळ बचावकार्य राबवण्यात आले परंतु तिघांना वाचवण्यात अपयश.

Apr 19, 2025 12:12 (IST)

चिमुकल्याला भरधाव ट्रकने चिरडले, नागपूर हिंगणा नाका येथील काल घटना

सात वर्षीय चिमुकल्याला भरधाव ट्रकने चिरडले, यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नाका येथील काल संध्याकाळची घटना घडली 

आहान सूरज नायक असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव

मृतक आहान हा आईसोबत शहरातील रामदासपेठ येथून ट्युशन क्लास आटोपून घरी परत येताना ही दुर्दैवी घटना घडली

मुलाला चिरडून ट्रक चालकाने पळ काढला होता मात्र एमआयडीसी पोलिसांनी काही अंतरावर त्यास अटक केली

Apr 19, 2025 11:13 (IST)

हमीभावाने हरभरा विक्रीसाठी एकाही शेतकऱ्याने नोंदणीच केली नाही

रब्बी हंगामातील अर्धा हरभरा बाजारात विक्री झाल्यानंतर नाफेडने नोंदणी सुरू केली. या नोंदणीलाही अनेक अटींसह चाळणी आणि गाळणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. 1 एप्रिल पासून हमीभावाने हरभरा विकण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. मात्र 17 एप्रिल पर्यंत धाराशिव मधील एकाही शेतकऱ्याने नोंदणी केली नाही. या उलट 5500 ते 5600 दराने शेतकरी आपला हरभरा अडत बाजारात विक्री करीत आहेत.

Apr 19, 2025 09:32 (IST)

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, टिटवाळा-खडवलीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

टिटवाळाजवळील खडवली रेल्वे स्थानकाजवळ अज्ञातांनी रुळालगत असलेल्या सिग्नलच्या वायर तोडल्या

काल मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली असल्याचे प्राथमिक माहिती

सिग्नलच्या वायर तुटल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम

सिग्नलच्या तुटलेल्या वायर दुरुस्तीचे काम सुरू

सकाळी 8.30 च्या सुमारास खडवलीहून सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत केल्याची रेल्वेची माहिती

खडवलीकडे जाणारी वाहतूक अद्यापही विस्कळीतच

Apr 19, 2025 08:46 (IST)

Ratnagiri News : महाकुंभमेळ्यासाठी गेलेले खेडचे तिघे बेपत्ता

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी  गेलेले खेडचे तिघेजण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिन आर. चव्हाण, सिद्धांत राठोड, गिरीजाबाई अशी बेपत्तांची नावे आहेत. 25 जानेवारीला हे तिघेही महाकुंभमेळ्यासाठी गेले होते. सुभाष राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रयागराज-उत्तर प्रदेश पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्या तिघांचाही अद्याप कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. याबाबत प्रयागराज पोलिसांनी खेड पोलिसांशी संपर्क साधत शोध घेण्याबाबत कळवलं आहे.

Apr 19, 2025 08:45 (IST)

उसाच्या शेतात गांजाची झाडे, कोल्हापुरातील शेळकेवाडी गावातील शेतकऱ्याचा कारनामा

कोल्हापुरात एका शेतकऱ्यान त्याच्या उसाच्या शेतात गांजाची झाडे लावली. पोलिसांनी याची माहिती मिळताच 15 किलो ओला गांजा या शेतातून जप्त केला. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथील विठलाई परिसरातून हा गांजा जप्त केला. जयदीप यशवंत शेळके असं या गांजाची शेती करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. 

Apr 19, 2025 08:42 (IST)

पुणे शहर आणि परिसरातील तापमानाचा पारा 42.1 अंश सेल्सिअसपर्यंत पाेहोचला

पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून तापमानाचा पारा ४२. १ अंश सेल्सिअसपर्यंत पाेचला आहे.

पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे.

त्यामुळे नागरीकांनी घरातुन बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा वाढला आहे.दिवसा असलेल्या तीव्र उन्हाच्या झळांमुळे वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. 

Apr 19, 2025 07:25 (IST)

दिल्लीच्या मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली, चार नागरिकांचा मृत्यू

दिल्लीच्या मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली, चार नागरिकांचा मृत्यू, अनेक लोक अडकल्याची भीती

Apr 19, 2025 07:22 (IST)

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी केले 1.5 किलो ग्रामचे 2 IED नष्ट

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी केले 1.5 किलो ग्रामचे 2 IED नष्ट

205 कोबरा ची टीम एरिया डॉमिनेशन व डीमाईनिंग डयूटी वर होती निघाली

पोलीस स्टेशन उसूर अंतर्गत येत असलेल्या गुंजेपर्ती च्या रस्त्यावर नक्षल्यांनी लावलेले   2 नग IED ला Detect केले गेले

कोबरा 205 च्या टीमने सुरक्षित रित्या IED केला नष्ट 

पोलीस विभाग व सुरक्षा जवानांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

Topics mentioned in this article