"बडे से बडा बिजनेस पैसे से नही, बडी आयडिया से बडा होता है"... शाहिद कपूरच्या बदमाश कंपनी सिनेमाताल हा डायलॉग आठवण्याचं कारण आहे मुंबईतील एक रिक्षावाला. रिक्षाचालक दिवसाला किती पैसे कमावतात? असं विचारलं तर उत्तर येईल 1000-2000 रुपये. मात्र मुंबईतील एक रिक्षावाला महिन्याला 5 ते 8 लाख रुपयांचा कमाई करत आहे. विशेष म्हणजे यासाठी तो रिक्षा चालवत देखील नाही. मात्र त्यांच्या सुपिक डोक्यात आलेली एक कल्पना चालली आणि त्याने अनेकांना अंचबित केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लेन्सकार्ट कंपनीचे प्रोडक्ट लीडल राहुल रुपानी यांनी एक लिंक्डइन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईतील लाखोंची कमाई करणाऱ्या रिक्षा चालकाची माहिती दिली. रुपानी नुकतेच व्हिसाच्या अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन वाणिज्य दूतावासात गेले होते. रुपानी तेथे गेल्यावर त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं आणि त्यांना त्यांची बॅग आत घेऊन जाण्यास मज्जाव केला.
(नक्की वाचा - Vande Bharat Express : नागपूर ते पुणे आणि मुंबई मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, कधीपासून होणार सुरू?)
अमेरिकन वाणिज्य दूतावासात लॉकरची सुविधा किंवा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. येथे येणाऱ्या लोकांची हीच गरज या रिक्षा चालकाने ओळखली. रुपानी यांनी पुढे सांगितलं की, मी सामान कुठे ठेवायचं या विचारात असताना एक रिक्षा चालक तिथे आला आणि बॅग ठेवायची आहे का? अशी विचारणा केली.
रिक्षा चालकाने म्हटलं की, "साहेब, बॅग द्या. सुरक्षित ठेवेन. माझं रोजचं काम आहे. 1000 रुपये लागतील." रुपानी यांनी म्हटलं की आधी मला भीती वाचली. मात्र अमेरिकन वाणिज्य दुतावासातील काम देखील महत्त्वाचं आहे, त्यामुळे आता सामान कुठे ठेवायचं असा विचारही मनात आला. अशाप्रकारे रिक्षाचालकाची व्यवसायाची भन्नाट आयडिया मला कळाली. रुपानी यांनी अधिक माहिती विचारली त्यावेळी रिक्षाचालकाने सांगितलं की, तो रिक्षा अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर पार्क करतो आणि सर्व ग्राहकांना 1000 रुपयांमध्ये ही "बॅग-कीपिंग सेवा" देतो.
(नक्की वाचा- Thane 5 Best Vada Pav : ठाण्यातले 5 बेस्ट वडापाव, तुमचा फेव्हरेट कोणता ?)
अशाप्रकारे त्याला दररोज 20-30 ग्राहक मिळतात, ज्यातून त्याची 20 ते 30 हजार रुपयांची कमाई होते. म्हणजे रिक्षा न चालवता हा रिक्षाचालक महिन्याला 5-8 लाख रुपयांचा कमाई करतो. रिक्षाचालकाला याची कायदेशीर परवानगी नाही. मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने तो असं करतो, असं देखील रुपानी यांनी सांगितलं. सर्व बॅगा रिक्षात न ठेवता जवळच एका लॉकरमध्ये सुरक्षित ठेवल्या जातात आणि कुणालाही कसला त्रास होत नाही.
अशारितीने रिक्षाचालकाने फक्त ग्राहकांच्या समस्येला समजून घेतले आणि एक बिझनेस आयडिया तयार केली. ही खरी उद्योजकता आहे, जी रस्त्यावर आढळते, पुस्तकांमध्ये नाही, असं रुपानी यांनी म्हटलं. अनेकांना फक्त बॅग ठेवण्यासाठी 1000 रुपये आकारणे चुकीचे वाटू शकते. काही काळासाठी तुमचे सामान लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्च 50 ते 100 रुपये असतो. मात्र येथे लोकांची असहाय्यता लक्षात घेऊन 1000 रुपये आकारले जात आहेत, हे देखील चुकीचे आहे, असं रुपानी यांनी म्हटलं.