
जुलै महिन्यात ओव्हरफ्लो होणारा पवई तलाव 18 जूनलाच ओसंडून वाहू लागला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी महत्त्वाचा असलेला पवई तलाव आज सकाळी 6 च्या सुमारात पूर्ण भरून वाहू लागला. या तलावाची क्षमता 545 कोटी लीटर इतकी आहे. या तलावाचं पाणी पिण्यायोग्य नसून प्रामुख्याने ओद्योगिक वापरासाठी केलं जातं. या तलावातील पाणी आरे दुग्ध वसाहतीत इतर कारणांसाठी वापरले जाते.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा - Marathi Municipal School Closed : मराठी भाषा कशी वाचणार? गेल्या 13 वर्षात 131 मराठी शाळांना लागलं कुलूप
पवई तलाव कधी बांधला, यातील पाण्याचा उपयोग कशासाठी केला जातो?
- 1980 मध्ये पवई तलावाचं बांधकाम पूर्ण
- पवई तलावाच्या बांधकामासाठी १२.५९ लाख खर्च
- तलावाचे पाणलोट क्षेत्र ६.६१ किलोमीटर
🔹Powai Lake, one of the main artificial lakes under the jurisdiction of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), began overflowing around 6 am today.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 18, 2025
🔹With a storage capacity of 545 crore litres (5.45 billion litres), the lake's water is non-potable and is primarily used… pic.twitter.com/wCWX20cZQ6
- तलाव पूर्ण भरल्यानंतर त्यात ५४५.५ कोटी लीटर पाणी
- या तलावाचं ओव्हरफ्लो झालेलं पाणी मिठी नदीत जाऊन मिळतं
- हा तलाव पालिकाच्या मुख्यालयापासून साधारण २७ किलोमीटर अंतरावर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world